शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
4
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
5
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
6
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
7
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
8
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
9
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
10
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
12
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
13
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
14
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
15
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
16
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
17
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
18
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
19
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
20
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! राज्यघटनेचा मसुदा लिहिलेल्या टाईपरायटरसह अन्य वस्तूंवर होणार रासायनिक प्रक्रिया; १०० वर्षे टिकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 07:00 IST

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यांनी राज्यघटना ज्यावर टाईप केली त्या टाईपरायटरवर रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे.

ठळक मुद्देबाबासाहेबांचे कपडे, कोट, टाय, टोपी, जॅकेट, खुर्चीचाही समावेश

आनंद डेकाटे

नागपूर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष उपयोगात आणलेल्या वस्तू येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. त्या चिरकाल टिकाव्यात म्हणून त्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. जवळपास ८५ टक्के वस्तूंवर ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात बाबासाहेबांनी लिहिलेला ऐतिहासिक ग्रंथ ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तसेच भारतीय राज्यघटनेचा मसुदा पहिल्यांदा ज्या टाईपरायटवर टाईप केला त्याचा समावेश आहे. शांतिवन चिचोली येथील संग्रहालयातील या ऐतिहासिक वस्तूंवर अजबबंगला या केंद्रीय वस्तूसंग्रहालयात रासायनिक प्रक्रिया केली जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी प्रशिक्षित धम्म सेनानी तयार व्हावेत, असे विचार व्यक्त केले होते. धम्माचा सर्वांगीण अभ्यास असलेला प्रशिक्षित उपासक समाजात तयार व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी धम्म सेनानी वामनराव गोडबोले कामाला लागले. यासाठी त्यांना काटोल रोडवरील चिचोली या गावातील एका महिलेने आपले शेत दान दिले. या जागेवरच त्यांनी शांतिवन हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी महाविद्यालय उभारण्याचा त्यांचा मानस होता.

त्यांच्याकडे महामानवाच्या अनेक वस्तूही होत्या. डॉ. आंबेडकरांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांनीही त्यांना त्यांच्याकडे असलेल्या बाबासाहेबांच्या अनेक वस्तू भेट दिल्या. माईसाहेबांनीसुद्धा (बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी) त्यांना काही वस्तू भेट दिल्या. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले कपडे, कोट, टाय, टोपी, जॅकेट, खुर्ची यासह बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय राज्यघटनेच्या मसुदा ज्या टाईपरायटरवर सर्वप्रथम टाईप करण्यात आला होता, तो टाईपरायटर. ऐतिहासिक धम्म दीक्षा सोहळ्यासाठी वापरण्यात आलेली बुद्धमूर्ती आदींसह महामानवाच्या जीवनाशी संबंधित व त्यांनी प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तूंचा यात समावेश आहे.

आता या वस्तू कुठे ठेवायच्या, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. तेव्हा त्यांनी एक संग्रहालय उभारले. निधीअभावी त्यांना प्रशिक्षण इमारतीचे कामही पूर्ण करता आले नाही. त्यांच्यानंतर संजय पाटील हे शांतिवन चिचोलीची देखभाल करू लागले. येथील संग्रहालय तसे लहान. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने ते उभारण्यात न आल्याने महामानवाच्या वस्तू नष्ट होण्यास सुरुवात झाली. कपड्यांना वाळवी लागायला लागली. आता या वस्तू वाचविणे हेच एक मोठे आव्हान होते. यासाठी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी धावपळ केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. महामानवांच्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्या वस्तू अनेक वर्षे टिकून राहतील, या कामाला सुरुवात झाली. ती जवळपास पूर्णत्वाकडे आली आहे.

या ऐतिहासिक वस्तू योग्य ठिकाणी राहाव्यात म्हणून संग्रहालयाच्या इमारतीसाठी शासनाने विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत ४० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला. यासोबतच पर्यटन विकासांतर्गत १७ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. या निधीतून आता महामानवाच्या ऐतिहासिक वस्तूंंसाठी भव्य संग्रहालय, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मेडिटेशन सेंटर, उपासक गृह, बौद्ध धम्माचे शिक्षण देणारे प्रचारक विद्यालयाची इमारत, वसतिगृह आदी इमारती बांधून झाल्या आहेत. शेवटच्या फिनिशिंगचे काम शिल्लक आहे.

 

शांतिवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयात महामानवाशी संबंधित ५०० वर वस्तू आहेत. त्यातील ४०० वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया पार पडली आहे. परंतु संग्रहालयाचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. वस्तू संग्रहालय तातडीने सुरू झाले नाही तर रासायनिक प्रक्रिया झालेल्या वस्तू कुठे ठेवणार. त्याची योग्य देखभाल न झाल्यास त्या पुन्हा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- संजय पाटील,

कार्यवाह, शांतिवन चिचोली

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती