शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की तुकडे पाडू ईच्छिता; उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

By नरेश डोंगरे | Updated: December 12, 2025 19:50 IST

Nagpur : महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता; असा थेट सवाल आज उद्धव ठाकरें यांनी राज्य सरकारला केला. विधीमंडळाच्या सभागृहातून परतल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता; असा थेट सवाल आज उद्धव ठाकरें यांनी राज्य सरकारला केला. विधीमंडळाच्या सभागृहातून परतल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी रेटल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ही मागणी पूर्ण होऊच शकत नाही. 

विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र विदर्भाचा आहे. हा महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालण्याचा विषय आहे. जो कुणी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करेल, तो महाराष्ट्राचा नाही, असे म्हणत ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता, हे सरकारने जाहिर करावे, असे आव्हान देणारा प्रश्न ठाकरे यांनी केला. विदर्भाची मागणी करणारांनी आतापर्यंत विदर्भाच्या प्रश्नांवर काय केले, ते आधी सांगावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज

शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय ३० जूनला घेणार असल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी हा मुहूर्त कशासाठी असा प्रश्न करून घाव बसला तेव्हाच उपचाराची गरज असते, असे म्हटले. कधी नव्हे तेवढी वाईट स्थिती शेतकऱ्यांची आहे, असे सांगून शेतकाऱ्यांना तात्काळ मदतीची गरजही ठाकरे यांनी विशद केली.

ते कोण होतात ?

विरोधी पक्षनेत्यासाठी भाजपाने वडेट्टीवार आणि परब यांच्या नावाची गुगली टाकल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता ठाकरे यांनी 'ते' (भाजपा) कोण होतात. कुणाचे नाव द्यायचे ते आम्ही ठरवू. या संबंधाने आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही सभागृहातील पदांसाठी विरोधकांनी दोन आमदारांच्या नावांची शिफारस केल्याची माहिती त्यांनी दिली.                                                                                                                                                                                  

नैतिकता आणि शिवराज पाटील

काँग्रेस नेते शिवराज पाटील यांचे निधन झाल्याचे कळाल्यामुळे पत्रपरिषद सुरू करण्यापूर्वीच ठाकरे यांनी दिवंगत पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ते राजकारणात असताना शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढत होते. तरीसुद्धा त्यांची एक चांगली गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे, असे म्हणत त्यांनी पाटील देशाचे गृहमंत्री असताना २६/११ चा हल्ला झाला. त्यावेळी नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. अलिकडे राजकारणात नैतिकता दिसत नसल्याचे ठाकरे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray questions government: Want Maharashtra united or divided?

Web Summary : Uddhav Thackeray challenged the government to declare if it wants a united Maharashtra. He criticized the demand for a separate Vidarbha, emphasizing Vidarbha's integral connection to Maharashtra. Thackeray stressed the urgent need for farmer support and mentioned opposition leaders' nominations. He also praised Shivraj Patil's ethical resignation during the 26/11 attacks.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेWinterहिवाळाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारnagpurनागपूरVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र