शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की तुकडे पाडू ईच्छिता; उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

By नरेश डोंगरे | Updated: December 12, 2025 19:50 IST

Nagpur : महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता; असा थेट सवाल आज उद्धव ठाकरें यांनी राज्य सरकारला केला. विधीमंडळाच्या सभागृहातून परतल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता; असा थेट सवाल आज उद्धव ठाकरें यांनी राज्य सरकारला केला. विधीमंडळाच्या सभागृहातून परतल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी रेटल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ही मागणी पूर्ण होऊच शकत नाही. 

विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र विदर्भाचा आहे. हा महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालण्याचा विषय आहे. जो कुणी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करेल, तो महाराष्ट्राचा नाही, असे म्हणत ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. महाराष्ट्र अखंडित ठेवू ईच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू ईच्छिता, हे सरकारने जाहिर करावे, असे आव्हान देणारा प्रश्न ठाकरे यांनी केला. विदर्भाची मागणी करणारांनी आतापर्यंत विदर्भाच्या प्रश्नांवर काय केले, ते आधी सांगावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज

शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय ३० जूनला घेणार असल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी हा मुहूर्त कशासाठी असा प्रश्न करून घाव बसला तेव्हाच उपचाराची गरज असते, असे म्हटले. कधी नव्हे तेवढी वाईट स्थिती शेतकऱ्यांची आहे, असे सांगून शेतकाऱ्यांना तात्काळ मदतीची गरजही ठाकरे यांनी विशद केली.

ते कोण होतात ?

विरोधी पक्षनेत्यासाठी भाजपाने वडेट्टीवार आणि परब यांच्या नावाची गुगली टाकल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता ठाकरे यांनी 'ते' (भाजपा) कोण होतात. कुणाचे नाव द्यायचे ते आम्ही ठरवू. या संबंधाने आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही सभागृहातील पदांसाठी विरोधकांनी दोन आमदारांच्या नावांची शिफारस केल्याची माहिती त्यांनी दिली.                                                                                                                                                                                  

नैतिकता आणि शिवराज पाटील

काँग्रेस नेते शिवराज पाटील यांचे निधन झाल्याचे कळाल्यामुळे पत्रपरिषद सुरू करण्यापूर्वीच ठाकरे यांनी दिवंगत पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ते राजकारणात असताना शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढत होते. तरीसुद्धा त्यांची एक चांगली गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे, असे म्हणत त्यांनी पाटील देशाचे गृहमंत्री असताना २६/११ चा हल्ला झाला. त्यावेळी नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. अलिकडे राजकारणात नैतिकता दिसत नसल्याचे ठाकरे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray questions government: Want Maharashtra united or divided?

Web Summary : Uddhav Thackeray challenged the government to declare if it wants a united Maharashtra. He criticized the demand for a separate Vidarbha, emphasizing Vidarbha's integral connection to Maharashtra. Thackeray stressed the urgent need for farmer support and mentioned opposition leaders' nominations. He also praised Shivraj Patil's ethical resignation during the 26/11 attacks.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेWinterहिवाळाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारnagpurनागपूरVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र