शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

कमी मार्क्समुळे निराश वाटतंय? हे वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 10:52 IST

अवघ्या काही मार्क्सनी ९० टक्के किंवा ९५ टक्के हुकले, आता संपलं सगळं... असं म्हणून निराशेच्या गर्तेत जाणारी हुशार मुलं आणि ती निराशा पेलता न आल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारी मुलं बारावीच्या परीक्षेनंतर अधिक ठळकपणे दिसू लागतात.

ठळक मुद्देवर्किंग टुगेदर फॉर प्रीव्हेंट सुसाईडस्स्वाती धर्माधिकारी यांनी सांगितल्या प्रतिबंधात्मक टिप्स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या काही मार्क्सनी ९० टक्के किंवा ९५ टक्के हुकले, आता संपलं सगळं... असं म्हणून निराशेच्या गर्तेत जाणारी हुशार मुलं आणि ती निराशा पेलता न आल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारी मुलं बारावीच्या परीक्षेनंतर अधिक ठळकपणे दिसू लागतात. एक आकडेवारी असं सांगते की एखाद्या मुलाने कमी मार्क्स मिळाल्याने आत्महत्या केल्याचे एक प्रकरण जेव्हा उजेडात येते तेव्हा त्यामागे २० मुलांच्या मनात तसा विचार येऊन गेलेला असतो किंवा त्यांनी तसा प्रयत्न केलेला असतो. या पार्श्वभूमीवर आपल्याला कमी मार्क्स पडले, असे वाटणारे बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याविषयी नागपुरातील ज्येष्ठ मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. स्वाती धर्माधिकारी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी प्रतिबंधात्मक टिप्स दिल्या.दहावी-बारावीचे निकाल हा विद्यार्थ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न का होतोय यावर गंभीरपणे पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शासन व विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन विचार करायला हवा आहे. दहावी-बारावीचे गुण आणि पुढील आयुष्य यांचा संबंध जो साधारपणपणे जोडला जातो तो एका बाजूने खरा मानला तरी तो अंतिम सत्य नसतो. इतिहासात हजारो उदाहरणे आहेत की नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे एखाद्या दुसऱ्याच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. केवळ तीन तासांच्या लिखाणावर एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता कशी काय मोजली जाऊ शकते? तशी त्याच्या कुटुंबीयांनी मोजावी काय? किंवा त्या विद्यार्थ्याने स्वत:ही मोजावी काय? कमी गुणांचा किंवा अपेक्षेनुसार गुण न मिळाल्याचा अथवा नापास झाल्याचा ताण येणे स्वाभाविक आहे. पण ताण हा आयुष्य संपवणारा का ठरतो? त्याला तसे का ठरू द्यायचे? सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, परीक्षेतील गुणांवरून आयुष्यात आपण यशस्वी ठरणार की नाही ते अजिबात ठरत नाही. संपूर्ण आयुष्यातला तो फक्त एक छोटासा कालावधी असतो की ज्यात तुम्हाला काही काळापुरती निराशा आलेली असते.

पालकांनी अशावेळी नेमकं काय करावं?पालकांनी आपल्या पाल्याच्या गुणांबाबत टोकाचे आग्रही असू नये. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरूनच त्यांनी त्याला अभ्यासक्रम निवडताना सूचना कराव्यात वा सल्ले द्यावेत. मुख्य म्हणजे स्वत:ला पूर्ण न करता आलेली शैक्षणिक आवड त्यांच्यावर लादण्याची चूक अजिबात करू नये. मुलांमधील मानसिक बदलही जागरूकपणे टिपायला हवेत. आपला मुलगा सतत नकारात्मक विचार करत असेल तर तात्काळ समुपदेशकांची मदत घ्यावी. निकालाबाबत खूप चर्चा चर्वण करू नये. त्याला अवास्तव महत्त्व देऊ नये. पाल्याची अन्य मुलांसोबत तुलना अजिबात करू नये.या निराशेपासून वाचायचे कसे?विद्यार्थ्यांना मला सांगावेसे वाटते, की ही परीक्षा अंतिम परीक्षा नव्हती असे स्वत:ला ठामपणे सांगा. ही फक्त बारावीची एक परीक्षा होती. पुढे आयुष्यात खूप वेगळी वळणे, वेगळ््या वाटा दडलेल्या आहेत आणि त्या सर्व चांगल्याच असणार आहेत हे स्वत:ला बजावणे आवश्यक असते. वर म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ताण येऊ शकतो. मात्र हा ताण हाताळता येतो. कमी करता येतो आणि संपविताही येतो. त्यासाठी तुम्ही मदत घेऊ शकता. स्वप्नं पहाण्यात काहीच चूक नाही. मात्र त्याला पर्यायही ठेवले पाहिजेत. जसं प्लॅन ए फिस्कटला तर प्लॅन बी आणि प्लॅन सी तयार असावा. त्यासोबतच आपल्या क्षमता, मर्यादा यांचाही विचार आणि स्वीकार करायला शिकलं पाहिजे. स्वत:कडून केलेल्या अवास्तव अपेक्षाही प्रसंगी तुम्हाला निराशा देऊ शकतात.मन निराश होणे ही आपल्याला लागलेली फक्त एक वाईट सवय आहे. ती प्रयत्नपूर्वक बदलता येते. पालक किंवा अन्य कोणत्या समजदार व्यक्तीसोबत चर्चा करा. तुमच्या मनात येणारे सगळे विचार व्यक्त करा. भावनांना प्रगट करा. मन मोकळं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यातील गुणवत्ता दिसू लागेल, क्षमतांची जाणीव होईल आणि पुढचे योग्य मार्ग दिसू लागतील.स्वत:मधले हे कौशल्य, आवड, क्षमता आणि उपलब्ध संसाधने यांची सांगड घालून योग्य असा अभ्यासक्रम किंवा व्यवसाय तुम्ही निवडू शकता. तसं केलं नाही तर मग अपयश येण्याची शक्यता मोठी होते आणि आत्मविश्वास कमी होत जातो.

https://www.facebook.com/lokmat/videos/2003681709738098/

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालMental Health Tipsमानसिक आरोग्य