शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांपेक्षा कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात का?

By admin | Updated: January 24, 2015 02:16 IST

बीएसस्सी अभ्यासक्रमातील नापास विद्यार्थ्यांच्या मुद्यावर ‘अभाविप’ने (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) शुक्रवारी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले.

नागपूर : बीएसस्सी अभ्यासक्रमातील नापास विद्यार्थ्यांच्या मुद्यावर ‘अभाविप’ने (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) शुक्रवारी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. प्रभारी कुलगुरूंनी याअगोदर आश्वासन देऊनदेखील पावले उचलली नाही आणि आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी त्यांना कार्यक्रम जास्त महत्त्वाचे वाटतात, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
५ हजार विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी अभाविपने केली. सत्र २०१२ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्षाला शिकत असलेले विद्यार्थी काही विषयात अनुत्तीर्ण राहिले. नागपूर विद्यापीठाने पारित केलेल्या अध्यादेशानुसार तीन प्रयत्नांमध्ये सदर प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या सत्र पद्धतीमध्ये सामावून घेण्यात येते. तसेच, सदर विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रम पद्धतीमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घ्यावा लागतो. सदर ठराव विद्यापीठाने महाविद्यालयांचे हितसंबंध लक्षात घेऊन केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अजून एक संधी देण्यात यावी, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली. प्रभारी कुलगुरू पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार कार्यक्रमाला गेले होते. त्यांची भेट न झाल्याने कार्यकर्ते आणखी संतप्त झाले. अखेर प्र-कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर व कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांनी विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनात अभाविपचे महानगर मंत्री गौरव हरडे, सहमंत्री रजतराज बघेल,जिल्हा संयोजक अमेय विश्वरुप, प्रसिद्धीप्रमुख अभिजित वडनेरे हे प्रामुख्याने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)