शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त-महापौरांमध्ये वाद : जनतेच्या नावावर हा संघर्ष योग्य नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 22:15 IST

सहा महिन्यापूवी नागपूर शहराचे नाव देशातच नव्हे तर जगातील विकसनशील शहरांच्या यादीमध्ये गणले जायचे. मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. महानगरपालिकेकडून अलीकडे कोणतेही विकास कार्य झालेले नाही किंवा पूर्णही झालेले नाही. अनेक प्रभागातील महत्त्वाची कामेही ठप्प आहेत. असे घडण्याला कारण एकच! ते म्हणजे, महानगरपालिकेतील प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष! मात्र सध्या जे काही सुरू आहे, ते जनतेच्या आणि शहराच्या हिताचे नाही, हे मात्र तेवढेच खरे.

ठळक मुद्देशहराच्या विकासावर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहा महिन्यापूवी नागपूर शहराचे नाव देशातच नव्हे तर जगातील विकसनशील शहरांच्या यादीमध्ये गणले जायचे. मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. महानगरपालिकेकडून अलीकडे कोणतेही विकास कार्य झालेले नाही किंवा पूर्णही झालेले नाही. अनेक प्रभागातील महत्त्वाची कामेही ठप्प आहेत. असे घडण्याला कारण एकच! ते म्हणजे, महानगरपालिकेतील प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष! मात्र सध्या जे काही सुरू आहे, ते जनतेच्या आणि शहराच्या हिताचे नाही, हे मात्र तेवढेच खरे.प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील वाद आता सभागृहातून रस्त्यावर पोहचला आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापौर संदीप जोशी पोलीस ठाण्यात पोहचले. मनपाच्या सदनामध्ये तब्बल चार दिवस स्थगन प्रस्तावावर चर्चा झाली. आयुक्तांवर आरोपांच्या फैरी झडल्या. त्यांनीही आरोपांना उत्तरे दिली. थांबलेली कामे सुरू करण्याबद्दल सदस्यांकडून विचारणा झाली. त्यावर आर्थिक अडचणीचे कारण देत आयुक्तांनी असमर्थता व्यक्त केली. सध्या निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता विकास कामे लवकर सुरू होतील, याची खात्री वाटत नाही.कोविड-१९ च्या वाढत्या प्रकोपामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन व सरकारच्या थांबलेल्या महसुलामुळे महानगरपालिकेचे अनुदानही घटले आहे. आर्थिक अडचणीच्या कारणामुळे नवी विकास कामे सुरू झालेली नाहीत. मान्सून सुरू होण्यापूर्वी चेंबर, गडरलाईन, नाल्यांच्या भिंतीची दुरुस्ती, रस्त्यावरील खड्ड्यांंची डागडुजी आदी कामे सुरू केली जायची. मात्र या वर्षी कसलीही कामे झालेली नाहीत.अशी बदलली परिस्थितीविकासाच्या मार्गावरून धावणाऱ्या नागपूर शहराची प्रशासकीय सूत्रे शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी अशी प्रतिमा असणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आली. २८ जानेवारीला त्यांनी पदभार सांभाळला. नागपूर शहराची ओळख यापुढे मुंढे पॅटर्न अशी असेल, असा विश्वास त्यांनी आल्या आल्याच व्यक्त केला होता. देयकांचे येणे बाकी असल्याने काही काळ नवीन कामे सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट करीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी कामाला सुरुवात केली होती. मात्र याच काळात ११ मार्चला नागपूर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. एप्रिल ते जून या काळात कडक लॉकडाऊन चालले. जुलै महिन्यात काही प्रमाणात शिथिलता मिळाली, मात्र विकासाची गती मंदावली. प्रत्येक महिन्यात जीएसटीच्या अनुदानापोटी ९३ कोटी रुपये मिळायचे. लॉकडाऊनमध्ये ही रक्कम ५४ कोटींवर आली. मनपाला दर महिन्यात नियमित खर्च, वेतन, पेन्शन या खर्चासाठी ११० कोटी रुपयांची आवशक्ता आहे. ही रक्कम जुळवता जुळवता मनपा प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.महापौरांच्या योजनाही ठप्पपदभार स्वीकारल्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी शहरातील एक लाख कुत्र्यांची नसबंदी, शौचालयांची संख्या वाढविणे, विकास कामात वेग अशा योजना आखल्या होत्या. जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी झोनस्तरावर बैठकांचेही नियोजन केले होते. मात्र या अपेक्षांवरही पाणी फेरल्या गेले. आयुक्त म्हणून मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रत्येक कामे बंद पाडली जात असल्याचा महापौर आणि सत्ताधारी गटाचा आरोप आहे. ते राजकीय दबावामध्ये असे वागत असल्याचाही आरोप आहे. आयुक्तांशी वैर नाही. मात्र त्यांची कार्यपद्धती योग्य नसल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रभागातील लहान-मोठी कामेही थांबलेली आहेत. कोरोनाच्या काळात नगरसेवकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाले. परिणामत: संक्रमण थांबविता आले नाही. कार्यादेश मिळालेली कामेही मौखिक आदेशाने थांबविल्या गेली. नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कामांना कार्यादेश दिले होते. ते सुरू करण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नसतानाही आयुक्तांनी मुद्दाम आडकाठी घातल्याचा सत्ताधाºयांचा आरोप आहे.आर्थिक स्थिती वाईट नाहीचुंगीकर लागू असताना महानगरपालिका स्वत: उत्पन्न करून स्वत: खर्च करीत होती. राज्य सरकारकडे हात पसरावे लागत नसे. मात्र २०१३ मध्ये एलबीटी लागू केल्यापासून मनपाची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. सुरुवातीच्या तीन महिन्यात तर उत्पन्न फक्त १० ते १५ कोटी रुपयावर घसरले. या परिस्थितीत विकास कामे थांबली, पण मनपातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार मात्र थांबले नाही. पुढे काही दिवसांनी परिस्थिती सामान्य झाली. सध्या राज्य सरकारच्या अनुदानावर मनपाला अवलंबून राहावे लागत आहे. कोविड संक्रमणाच्या काळात जीएसटी अनुदान ४० टक्क्यांनी घटले. मात्र संपत्ती कर, नगर रचना शुल्क, बाजार विभाग आदींमधून मनपाला चांगले उत्पन्न मिळाले. अर्थतज्ज्ञांच्या मते, नवीन विकास कामे न झाल्याने अतिरिक्त बोजा वाढलेला नाही. खर्च बराच अधिक असला तरी तो आटोक्यात आणता येऊ शकतो. त्यामुळे आर्थिक अवस्था एवढी वाईट नाहीच.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढे