शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाच वर्षांखालील मुलांमध्ये अतिसार मृत्यूचे मुख्य कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:09 IST

नागपूर : भारतात दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू होतो. यांतील जवळपास सहा लाख बालके अतिसारामुळे बळी पडतात. पाच वर्षांखालील ...

नागपूर : भारतात दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू होतो. यांतील जवळपास सहा लाख बालके अतिसारामुळे बळी पडतात. पाच वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण अतिसार आहे. यावर क्षार संजीवनी व झिंकचा उपचार दिल्यास बालमृत्यूंचे प्रमाण निश्चित कमी करता येऊ शकते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली.

‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स असोसिएशन’च्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात लहान मुलांमधील अतिसार या विषयावर तज्ज्ञँनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय धोटे, सचिव डॉ. पंकज अग्रवाल, उपाध्यक्ष डॉ. संजय पाखमोडे, सहसचिव डॉ. अर्चना जयस्वाल, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आदी उपस्थित होते.

डॉ. धोटे म्हणाले, पाच वर्षांखालील मुलाला सुमारे दोन-तीन वेळा अतिसाराच्या आजाराला सामोरे जावे लागते. उपचार न झाल्यास गंभीर जलशुष्कतेमुळे धोका वाढतो. यावरील उपचारात झिंक हे अल्प प्रमाणात लागणारे खनिज आहे. जे शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्याकरिता गरजेचे ठरते. पेशीच्या वाढीमध्ये आणि प्रतिकार यंत्रणेच्या कार्यामध्येही याची भूमिका महत्त्वाची ठरते, असेही ते म्हणाले. डॉ. अग्रवाल म्हणाले, अतिसारावर क्षार संजीवनीसोबतच (ओआरएस) झिंक पुरेसे घेतल्यास जुलाबाचा कालावधी आणि तीव्रता कमी होते. अतिसाराची स्थिती सुधारते. झिंक हे अतिसाराच्या उपचारामध्ये रोखथामचे काम करते.

.... तर दोन महिने लागण होण्याची शक्यता कमी

डॉ. पाखमोडे म्हणाले, अतिसार झाल्यानंतर झिंक आणि क्षार संजीवनी १४ दिवसांपर्यंत दिल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांपर्यंत अतिसाराची लागण होण्याची शक्यता कमी होते. डॉ. जयस्वाल म्हणाल्या, झिंकचे दुष्परिणाम सामान्य असले तरी ते देण्यापूर्वी बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम

डॉ. गावंडे म्हणाले, दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अपचनामुळे वारंवार जुलाब होण्यास सुरुवात होते, मात्र जंतुसंसर्ग, अन्नबाधा, अन्नविषबाधा आणि औषधाच्या अतिसेवनामुळेही अतिसार होतो. प्रतिजैविके आणि आम्लताविरोधी औषधांमुळे वारंवार जुलाब होतात. दीर्घ मुदतीचा अतिसार आणि लघुमुदतीचा अतिसार असे त्याचे दोन प्रकार ढोबळमानाने दिसून येतात.