मेहा शर्मा
नागपूर : अजनी येथे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पासाठी हाेणाऱ्या वृक्षताेडीविराेधात माेठे आंदाेलन पेटले आहे. याचवेळी शहरातील राजकीय क्षेत्रातील एका समूहाने पर्यावरणाऐवजी विकासाला पूरक भूमिका घेतली आहे. नुकतेच माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत महापाैर दयाशंकर तिवारी यांनी झाडांना महत्त्व देण्यापेक्षा आयएमएस प्रकल्प हाेणे शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. यावर लाेकमतने शहरातील काही मान्यवरांच्या भूमिका जाणून घेतल्या.
विकासासाेबत पर्यावरण संवर्धन आवश्यक : अभिजित वंजारी
आमदार अॅड. अभिजित वंजारी यांनी विकास साधताना पर्यावरण संरक्षणाचेही महत्त्व अधाेरेखित केले. विकासकामे करताना झाडांचा बळी जाताे. मात्र याचवेळी पर्यावरणवाद्यांच्या मागण्याही लक्षात घेणे आवश्यक आहे. अजनी वनाच्या प्रकरणात प्रकल्प कंत्राटदाराने ही बाब गंभीरतेने लक्षात घ्यावी आणि पर्यावरण विभागाकडून एनओसी मिळाल्यानंतरच प्रकल्पाचे काम पुढे न्यावे. शहरात अनेक जागा रिकाम्या आहेत. अजनी ते रहाटे काॅलनीपर्यंत माेठी जागा पडित आहे. सरकार, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अजनीवनाचा पर्याय म्हणून या जागेची निवड करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. झाडे पुनर्राेपित करता येणे अशक्य आहे. अजनी परिसरातच वृक्षाराेपण करण्याला प्राधान्य द्यावे. विकास आणि पर्यावरण या दाेन्हीकडे लक्ष केंद्रित करून निर्णय घ्यावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आयएमएस आवश्यक, पर्यावरणाचा बाऊ नकाे : गिरीश गांधी
वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी, आयएमएस प्रकल्प आवश्यक असून पर्यावरणाच्या नावाने नाहक बाऊ केला जात असल्याची टीका केली. वृक्षताेडीला आपलाही विराेध असल्याचे ते म्हणाले. मात्र काही प्रकल्प हे शहरातील नागरिकांच्या फायद्याचे असतात व अशा प्रकल्पांना विराेध करणे अयाेग्य असल्याचे ते म्हणाले. भरतवनच्या वेळी आम्ही वृक्षताेडीला विराेध केला कारण हा प्रकल्प शहराच्या साैंदर्यीकरणासाठी हाेता. मात्र आयएमएस प्रकल्प नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे आणि ताे व्हायलाच हवा, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
झाडे न कापता विकास शक्य : विकास ठाकरे
नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त आमदार विकास ठाकरे म्हणाले, विकास आवश्यक आहे पण झाडे न ताेडता करता येताे का तेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अजनी वनाच्या विषयावर पालकमंत्र्यांनी सत्ताधारी व विराेधी पक्ष यांच्याशी चर्चा करावी. याबाबत पालकमंत्र्यांना पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने वेगवेगळा विचार मांडला तर या समस्येवर उपाय काढता येणार नाही. या समस्येवर उत्तर शाेधणे गरजेचे आहे. अजनी वन हा केवळ एक विषय नाही. अंबाझरी उद्यान व बाॅटनिकल गार्डनमधील वृक्षताेड व झाडे जाळण्याचा विषय गंभीर आहे. सरकार खाजगी कंपन्यांच्या हाती साेपवून पर्यावरणाचे अताेनात नुकसान करीत आहे.