शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

शेगावच्या आनंदसागरच्या धर्तीवर होणारा नागपुरातील अंबाझरीचा विकास बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:16 PM

शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ४२.४२ एकर जागा दिली होती. महामंडळाच्या उदासीन कारभारामुळे तूर्त हा प्रकल्प बारगळला असल्याने प्रकल्पासाठी दिलेली जागा महापालिका परत घेणार आहे.

ठळक मुद्देमनपा पर्यटन विकास महामंडळाकडून ४२.४२ एकर जागा परत घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ४२.४२ एकर जागा दिली होती. महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार होता. परंतु गेल्या साडेतीन वर्षात महामंडळाने प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने कोणत्याही स्वरुपाचा पुढाकार घेतलेला नाही. महामंडळाच्या उदासीन कारभारामुळे तूर्त हा प्रकल्प बारगळला असल्याने प्रकल्पासाठी दिलेली जागा महापालिका परत घेणार आहे.मौजा अंबाझरी येथील अंबाझरी तलावाजवळील खसरा क्र. १ मधील ४४ एकर क्षेत्र शासकीय असून यापैकी उद्यानाचे उत्तरेकडील १९ एकर क्षेत्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत विकसित करण्यास व उर्वरित २५ एकर क्षेत्र महापालिका विकसित करणार होती.अंबाझरी तलाव व उद्यान परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरुप प्राप्त होणार होते. या प्रकल्पातून प्राप्त नफ्यातील ७५ टक्के रक्कम महापालिकेला तर २५ टक्के पर्यटन विकास महामंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावाला महापालिका सभागृहात ६ आॅक्टोबर २०१५ रोजी मंजुरी देण्यात आली होती. महापालिकेने कोणताही मोबदला न घेता महामंडळाला प्रकल्पासाठी ४२.४२ एकर जागा उपलब्ध केली होती. शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास केला जाणार होता. येथे बोटिंग सुविधा, मनोरंजनाची साधने, तसेच तलाव व उद्यानाचे सौंदर्यीकरण केले जाणार होते. यातून महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र पर्यटन विकास महामंडळाने गेल्या साडेतीन वर्षात अंबाझरीचा कोणत्याही स्वरुपाचा विकास केलेला नाही. यामुळे ही जागा महापालिका परत घेणार आहे. ३० नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासनअंबाझरी तलाव व उद्यानाचा गांधीसागरच्या धर्तीवर विकास व्हावा, यासाठी समिती गठित करण्यात येईल. प्रकल्पासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिले होते. परंतु आश्वासनानुसार हा प्रकल्प राबविण्यात आला नाही.

टॅग्स :Anand Sagarआनंदसागर