शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोनासोबत डेंग्यूही वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 23:45 IST

कोविडवर जसे अद्यापही स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टिबायोटिक किंवा अ‍ॅण्टिव्हायरल औषध नाही, तसेच डेंग्यू आजाराचेसुद्धा आहे. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना डेंग्यूचेही रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. जानेवारी ते जूनपर्यंत नागपूर जिल्ह्यात २९ रुग्ण आणि दोघांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील १६ रुग्ण, एक मृत्यू तर ग्रामीणमध्ये १३ रुग्ण, एक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ग्रामीणमध्ये ९४ रुग्ण आणि तीन मृत्यू होते तर शहरात ६२७ रुग्ण व दोन मृत्यू होते.

कोविडवर जसे अद्यापही स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टिबायोटिक किंवा अ‍ॅण्टिव्हायरल औषध नाही, तसेच डेंग्यू आजाराचेसुद्धा आहे. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. या आजाराला कारणीभूत असलेली ‘एडिस’ मादी डास तिच्या जीवनचक्रात १४ ते २१ दिवसांत साधारणत: ३०० अंडी घालते. या डासांची पैदास पाच एमएल पाण्यातही होते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. जुलै ते सप्टेंबर महिन्यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. नागपूर ग्रामीणमध्ये या वर्षी झालेला डेंग्यूचा मृत्यू हा संशयित मृत्यू म्हणून नोंद आहे. सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने हा आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात ७२१ रुग्ण, पाच मृत्यूनागपूर शहरात २०१२ मध्ये पहिल्यांदाच डेंग्यूच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. यावर्षी २३७ रुग्ण व पाच मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४०वर पोहचली. यात दोन मृत्यू होते. २०१४ मध्ये ६०१, २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५, २०१७ मध्ये २००, २०१८ मध्ये ५४३ तर २०१९ मध्ये ६२७ रुग्ण, दोन मृत्यूची नोंद झाली. सात वर्षांतील ही सर्वाधिक नोंद आहे. तर गेल्या वर्षी ग्रामीण भागात ९४ रुग्ण, तीन मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७२१ रुग्ण, पाच मृत्यू होते.डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यामनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या प्रमुख दीपाली नासरे म्हणाल्या, डेंग्यूला कारणीभूत असलेल्या एडिस डासावर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. रिकामे डबे, मडकी, नारळाच्या रिकाम्या करवंट्या, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. कुलर सुरू असेल तर त्यातील पाणी दर तीन दिवसांनीे बदलायला हवे. दर आठवड्याला त्याचा तळ ब्रशने घासायला हवा. यामुळे चिकटलेली अंडी निघतात. विहीर, पाण्याच्या टाक्यात गप्पी मासे सोडावे. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.कोविडच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू होऊच नयेडेंग्यूमध्ये रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, यामुळे कोविडसारख्या आजाराचा संसर्ग होण्याची व गुंतागुंत वाढण्याचा अधिक धोका राहतो. डेंग्यू होऊच नये यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तूर्तासतरी डेंग्यू असलेल्या रुग्णाला कोविड झालेला नाही. 

 

टॅग्स :dengueडेंग्यू