शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
4
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
5
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
6
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
7
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
9
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
10
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
11
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
12
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
13
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
14
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
15
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
16
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
17
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
18
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
19
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
20
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोनासोबत डेंग्यूही वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 23:45 IST

कोविडवर जसे अद्यापही स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टिबायोटिक किंवा अ‍ॅण्टिव्हायरल औषध नाही, तसेच डेंग्यू आजाराचेसुद्धा आहे. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना डेंग्यूचेही रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. जानेवारी ते जूनपर्यंत नागपूर जिल्ह्यात २९ रुग्ण आणि दोघांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील १६ रुग्ण, एक मृत्यू तर ग्रामीणमध्ये १३ रुग्ण, एक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ग्रामीणमध्ये ९४ रुग्ण आणि तीन मृत्यू होते तर शहरात ६२७ रुग्ण व दोन मृत्यू होते.

कोविडवर जसे अद्यापही स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टिबायोटिक किंवा अ‍ॅण्टिव्हायरल औषध नाही, तसेच डेंग्यू आजाराचेसुद्धा आहे. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. या आजाराला कारणीभूत असलेली ‘एडिस’ मादी डास तिच्या जीवनचक्रात १४ ते २१ दिवसांत साधारणत: ३०० अंडी घालते. या डासांची पैदास पाच एमएल पाण्यातही होते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. जुलै ते सप्टेंबर महिन्यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. नागपूर ग्रामीणमध्ये या वर्षी झालेला डेंग्यूचा मृत्यू हा संशयित मृत्यू म्हणून नोंद आहे. सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने हा आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात ७२१ रुग्ण, पाच मृत्यूनागपूर शहरात २०१२ मध्ये पहिल्यांदाच डेंग्यूच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. यावर्षी २३७ रुग्ण व पाच मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४०वर पोहचली. यात दोन मृत्यू होते. २०१४ मध्ये ६०१, २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५, २०१७ मध्ये २००, २०१८ मध्ये ५४३ तर २०१९ मध्ये ६२७ रुग्ण, दोन मृत्यूची नोंद झाली. सात वर्षांतील ही सर्वाधिक नोंद आहे. तर गेल्या वर्षी ग्रामीण भागात ९४ रुग्ण, तीन मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७२१ रुग्ण, पाच मृत्यू होते.डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यामनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या प्रमुख दीपाली नासरे म्हणाल्या, डेंग्यूला कारणीभूत असलेल्या एडिस डासावर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. रिकामे डबे, मडकी, नारळाच्या रिकाम्या करवंट्या, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. कुलर सुरू असेल तर त्यातील पाणी दर तीन दिवसांनीे बदलायला हवे. दर आठवड्याला त्याचा तळ ब्रशने घासायला हवा. यामुळे चिकटलेली अंडी निघतात. विहीर, पाण्याच्या टाक्यात गप्पी मासे सोडावे. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.कोविडच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू होऊच नयेडेंग्यूमध्ये रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, यामुळे कोविडसारख्या आजाराचा संसर्ग होण्याची व गुंतागुंत वाढण्याचा अधिक धोका राहतो. डेंग्यू होऊच नये यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तूर्तासतरी डेंग्यू असलेल्या रुग्णाला कोविड झालेला नाही. 

 

टॅग्स :dengueडेंग्यू