शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा म्हणजे लाँगमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:32 IST

लाँगमार्चला स्वाभिमानाचा आधार होता म्हणूनच या आंदोलनाने इतिहास घडविला. आंबेडकरी समाजात नव्याने उदंड आत्मविश्वास जागविला. दुर्दम्य आशावाद व सातत्याने लढण्याची प्रेरणा लाँगमार्चने दिली.

ठळक मुद्देवक्त्यांचा सूर : लाँगमार्च जिंदाबाद पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाँगमार्चला स्वाभिमानाचा आधार होता म्हणूनच या आंदोलनाने इतिहास घडविला. आंबेडकरी समाजात नव्याने उदंड आत्मविश्वास जागविला. दुर्दम्य आशावाद व सातत्याने लढण्याची प्रेरणा लाँगमार्चने दिली.सामाजिक ऐक्याची संधी उपलब्ध करून दिली. ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा हे लाँगमार्चच्या आंदोलनाचे देदीप्यमान वैशिष्ट्य ठरले. नामांतराचा लढा हा आंबेडकरी समाजाच्या स्वत्वसिद्धीचाच लढा होता, असा सूर उपस्थित वक्त्यांनी काढला.निमित्त होते ‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तक प्रकाशनाचे. मंगळवारी सीताबर्डी येथील नेताजी मार्केट येथील रिपब्लिकन मुव्हमेंट कार्यालयात हा सोहळा आंबेडकरी विचारवंत ताराचंद खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून थॉमस कांबळे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, पुस्तकाचे लेखक इ.मो. नारनवरे, गीता नारनवरे, अ‍ॅड. सुरेश घाटे व प्रकाशक नरेश वाहाणे उपस्थित होते. ‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तकावर भाष्य करताना डॉ. चोरमारे म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी आपल्या पुस्तकात कल्पनेला कुठलाही वाव दिला नाही. नामांतराचे वास्तववादी दर्शन या पुस्तकातून घडते.अंगावर शहारे आणणारे, माणसाला अंतर्मुख करणारे असे अनेक संदर्भ या पुस्तकात आहे. ‘लाँगमार्च जिंदाबाद’ म्हणजे परिश्रमाचे, त्यागाचे, लढाऊपणाचे व नि:स्वार्थपणाचे जिवंत चित्रण आहे.बुरशी लागलेल्या पोळ्या, नाल्याचे पाणी‘लाँगमार्च’च्या आठवणींना उजाळा देत थॉमस कांबळे म्हणाले, ११ नोव्हेंबर १९७१ रोजी पवित्र दीक्षाभूमीची माती कपाळी लावून प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या नेतृत्वात लाँगमार्च निघाला तेव्हा मराठवाडा विद्यापीठास ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे’ हा एकच ध्यास होता. माझ्यासह अनेक भीमसैनिक पाऊस, चिखल तुडवित चालत होते, सहभागी होत होते. बुरशी लागलेली भाकर, नाल्याचे पाणीही त्यावेळी गोड लागले. ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा या एकाच भूमिकेत सर्व जण होते.‘लाँगमार्च जिंदाबाद’ पुस्तक नव्हे इतिहासडॉ. आगलावे म्हणाले, ‘लाँगमार्च’ हे अस्मितेचे, स्वाभिमानाचे आंदोलन होते. या आंदोलनावर पहिले पुस्तक दिल्लीच्या विजय ढेंबरे यांनी लिहिले. परंतु ते पुस्तक प्रकाशित झाले नाही. इ.मो. नारनवरे यांनी लिहिलेले ‘लाँगमार्च जिंदाबाद’ हे पुस्तक नव्हे तर तो त्यांनी लिहिलेला इतिहास आहे. या आंदोलनाला स्वाभिमानाची किनार होती म्हणूनच ते ऐतिहासिक ठरले.‘लाँगमार्च’ची विचारवंतांनी दखल घेतली नाहीअध्यक्षस्थानावरून बोलताना खांडेकर म्हणाले, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर लाँगमार्च आंदोलन झाले. जोगेंद्र कवाडे हे या आंदोलनाचे प्रतीक होते. सम्यक क्रांतीच्या विचारांना घेऊन लढा लढविण्यात आला होता. यात ‘जयभीम’ साप्ताहिकाचे कार्य महत्त्वपूर्ण राहिले. मात्र, या ऐतिहासिक लढ्याची येथील विचारवंतांनी दखल घेतली नाही, ही खंत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र शेलार यांनी केले. संचालन भीमराव वैद्य यांनी तर आभार नरेश वाहाणे यांनी मानले.लाँगमार्चमधील निर्धार आता दिसून येत नाहीलेखक नारनवरे म्हणाले, ‘लाँगमार्च’ मी जगलो. यामुळे लाँगमार्चमध्ये सहभागी तमाम भीमसैनिकांप्रति अपार श्रद्धा अंतकरणात आहे. या आंदोलनाने अनेक पिढ्यांना जिवंत केले. भीमसैनिकांची परीक्षा पाहणारे असे हे आंदोलन होते. आप्त-परकीय ठरविण्याचे भान या लाँगमार्चने दिले. परंतु लाँगमार्चमधील तो निर्धार, आंबेडकरी समाजातील तो उदंड आत्मविश्वास नंतर कुठल्याच आंदोलनात दिसून येत नाही, ही खंत आहे, असेही ते म्हणाले.