शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा म्हणजे लाँगमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:32 IST

लाँगमार्चला स्वाभिमानाचा आधार होता म्हणूनच या आंदोलनाने इतिहास घडविला. आंबेडकरी समाजात नव्याने उदंड आत्मविश्वास जागविला. दुर्दम्य आशावाद व सातत्याने लढण्याची प्रेरणा लाँगमार्चने दिली.

ठळक मुद्देवक्त्यांचा सूर : लाँगमार्च जिंदाबाद पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाँगमार्चला स्वाभिमानाचा आधार होता म्हणूनच या आंदोलनाने इतिहास घडविला. आंबेडकरी समाजात नव्याने उदंड आत्मविश्वास जागविला. दुर्दम्य आशावाद व सातत्याने लढण्याची प्रेरणा लाँगमार्चने दिली.सामाजिक ऐक्याची संधी उपलब्ध करून दिली. ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा हे लाँगमार्चच्या आंदोलनाचे देदीप्यमान वैशिष्ट्य ठरले. नामांतराचा लढा हा आंबेडकरी समाजाच्या स्वत्वसिद्धीचाच लढा होता, असा सूर उपस्थित वक्त्यांनी काढला.निमित्त होते ‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तक प्रकाशनाचे. मंगळवारी सीताबर्डी येथील नेताजी मार्केट येथील रिपब्लिकन मुव्हमेंट कार्यालयात हा सोहळा आंबेडकरी विचारवंत ताराचंद खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून थॉमस कांबळे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, पुस्तकाचे लेखक इ.मो. नारनवरे, गीता नारनवरे, अ‍ॅड. सुरेश घाटे व प्रकाशक नरेश वाहाणे उपस्थित होते. ‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तकावर भाष्य करताना डॉ. चोरमारे म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी आपल्या पुस्तकात कल्पनेला कुठलाही वाव दिला नाही. नामांतराचे वास्तववादी दर्शन या पुस्तकातून घडते.अंगावर शहारे आणणारे, माणसाला अंतर्मुख करणारे असे अनेक संदर्भ या पुस्तकात आहे. ‘लाँगमार्च जिंदाबाद’ म्हणजे परिश्रमाचे, त्यागाचे, लढाऊपणाचे व नि:स्वार्थपणाचे जिवंत चित्रण आहे.बुरशी लागलेल्या पोळ्या, नाल्याचे पाणी‘लाँगमार्च’च्या आठवणींना उजाळा देत थॉमस कांबळे म्हणाले, ११ नोव्हेंबर १९७१ रोजी पवित्र दीक्षाभूमीची माती कपाळी लावून प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या नेतृत्वात लाँगमार्च निघाला तेव्हा मराठवाडा विद्यापीठास ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे’ हा एकच ध्यास होता. माझ्यासह अनेक भीमसैनिक पाऊस, चिखल तुडवित चालत होते, सहभागी होत होते. बुरशी लागलेली भाकर, नाल्याचे पाणीही त्यावेळी गोड लागले. ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा या एकाच भूमिकेत सर्व जण होते.‘लाँगमार्च जिंदाबाद’ पुस्तक नव्हे इतिहासडॉ. आगलावे म्हणाले, ‘लाँगमार्च’ हे अस्मितेचे, स्वाभिमानाचे आंदोलन होते. या आंदोलनावर पहिले पुस्तक दिल्लीच्या विजय ढेंबरे यांनी लिहिले. परंतु ते पुस्तक प्रकाशित झाले नाही. इ.मो. नारनवरे यांनी लिहिलेले ‘लाँगमार्च जिंदाबाद’ हे पुस्तक नव्हे तर तो त्यांनी लिहिलेला इतिहास आहे. या आंदोलनाला स्वाभिमानाची किनार होती म्हणूनच ते ऐतिहासिक ठरले.‘लाँगमार्च’ची विचारवंतांनी दखल घेतली नाहीअध्यक्षस्थानावरून बोलताना खांडेकर म्हणाले, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर लाँगमार्च आंदोलन झाले. जोगेंद्र कवाडे हे या आंदोलनाचे प्रतीक होते. सम्यक क्रांतीच्या विचारांना घेऊन लढा लढविण्यात आला होता. यात ‘जयभीम’ साप्ताहिकाचे कार्य महत्त्वपूर्ण राहिले. मात्र, या ऐतिहासिक लढ्याची येथील विचारवंतांनी दखल घेतली नाही, ही खंत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र शेलार यांनी केले. संचालन भीमराव वैद्य यांनी तर आभार नरेश वाहाणे यांनी मानले.लाँगमार्चमधील निर्धार आता दिसून येत नाहीलेखक नारनवरे म्हणाले, ‘लाँगमार्च’ मी जगलो. यामुळे लाँगमार्चमध्ये सहभागी तमाम भीमसैनिकांप्रति अपार श्रद्धा अंतकरणात आहे. या आंदोलनाने अनेक पिढ्यांना जिवंत केले. भीमसैनिकांची परीक्षा पाहणारे असे हे आंदोलन होते. आप्त-परकीय ठरविण्याचे भान या लाँगमार्चने दिले. परंतु लाँगमार्चमधील तो निर्धार, आंबेडकरी समाजातील तो उदंड आत्मविश्वास नंतर कुठल्याच आंदोलनात दिसून येत नाही, ही खंत आहे, असेही ते म्हणाले.