शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कुठे किती मदत दिली ते जाहीर करा; आमदार शशिकांत शिंदे यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:23 IST

विधान परिषदेत झळकला 'लोकमत' : शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. केंद्रीय पथक अडीच महिन्यांनंतर आले. केंद्राकडून अद्याप मदत आली नाही. आजही शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळालेली नाही. कुठे किती नुकसान झाले, कुठे किती मदत मिळाली, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

'लोकमत'चा अंक झळकावत लोकमतमध्ये प्रकाशित 'काहीही पेरा, उगवते कर्जाचेच पीक; विदर्भातील साडेतीन पिकांची कहाणी' या वृत्ताकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कापूस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळत नाही. व्यापारी कमी किमतीत शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत असल्यावर या वृत्तातून प्रकाश टाकण्यात आला आहे. याचे पडसाद सभागृहात दिसले.

आमदार प्रवीण दरकेर यांनी मांडलेल्या नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकरी दोन वर्षे उभा राहू शकत नाही. बोगस बियाणे व खतांच्या किमतीतून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. सरकारने हमी भाव जाहीर केला, तरी खासगी व्यापारी कमी भावाने शेतमाल खरेदी करतात. दुसरीकडे विकासाऐवजी सरकारी तिजोरीतून पैसे आणून निवडणुकीत फायदा घेतला जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, अधिकृत सावकारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही. याची सरकारने काळजी घ्यावी, पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. हमी भावाच्या तुलनेत कमी भावाने शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावी लागते. आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, संकटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे. राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना मदत वितरीत करण्यात आली आहे. चर्चेत शिवाजीराव गर्गे यांनीही सहभाग घेतला.

३८ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात

देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी ३८ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे. यात प्रामुख्याने विदर्भातील आत्महत्यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनापासून विदर्भातील लोकांना मोठ्या अपेक्षा असतात. परंतु मागील १५ वर्षांपासून वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही. विकासापासून विदर्भ, मराठवाडा, कोकण वंचित असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Declare aid given to farmers: MLA Shashikant Shinde demands

Web Summary : MLA Shinde demanded the government disclose aid details for distressed farmers due to heavy rains and floods. He highlighted farmers' exploitation through low prices and bogus seeds. Concerns were raised about farmer suicides and regional development disparities, urging government action and insurance coverage.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याfarmingशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShashikant Shindeशशिकांत शिंदे