शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:33 IST

आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यात पाणी टंचाईची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.पावसाळ्याचे दिवस आहे, परंतु काही अपवाद वगळ्यास अजूनही पाऊस पुरेसा झालेला नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात जुलै ६ तारखेला आलेला मुसळधार पाऊस सोडला तर धरणाना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ४ आॅगस्ट रोजी केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी असून यात १२१७.२७ दलघमी (३४.२५ टक्के) इतकाच जलसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात २१९.९० दलघमी म्हणजे २१.६२ टक्के इतका जलसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ६३.५८ टक्के, रामटेकमध्ये ३४.३९ टक्के, लोवर नांद वणा ५३.७४ टक्के, वडगाव ५६.९६ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४७.८ टक्के, सिरपूर २६.९७ टक्के, पुजारी टोला ७५.७६ टक्के, कालीसरार ७०.६९ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ९.९४ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ९३.४६ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना ६४.५२ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.७२ टक्के, धाम ३२.७५ टक्के, पोथरा १०० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २८.८० टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - २८.४ आणि बावनथडी २९.१३ टक्के इतका पाणीसाठा आहे.पोथरा हाऊसफुल्ल, असोलामेंढा ९३ टक्के भरलाविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प १०० टक्के भरला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ९३.४६ टक्के इतक ा भरला आहे. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा एकूण साठा कमी आहे. पोथराची क्षमता ३५ दलघमी तर असोलामेंढाचा ५२.३३ दलघमी इतका साठा आहे.येत्या दिवसात धरण भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २१.७९ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसे झाले नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

 

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई