शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:33 IST

आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यात पाणी टंचाईची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.पावसाळ्याचे दिवस आहे, परंतु काही अपवाद वगळ्यास अजूनही पाऊस पुरेसा झालेला नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात जुलै ६ तारखेला आलेला मुसळधार पाऊस सोडला तर धरणाना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ४ आॅगस्ट रोजी केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी असून यात १२१७.२७ दलघमी (३४.२५ टक्के) इतकाच जलसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात २१९.९० दलघमी म्हणजे २१.६२ टक्के इतका जलसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ६३.५८ टक्के, रामटेकमध्ये ३४.३९ टक्के, लोवर नांद वणा ५३.७४ टक्के, वडगाव ५६.९६ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४७.८ टक्के, सिरपूर २६.९७ टक्के, पुजारी टोला ७५.७६ टक्के, कालीसरार ७०.६९ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ९.९४ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ९३.४६ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना ६४.५२ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.७२ टक्के, धाम ३२.७५ टक्के, पोथरा १०० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २८.८० टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - २८.४ आणि बावनथडी २९.१३ टक्के इतका पाणीसाठा आहे.पोथरा हाऊसफुल्ल, असोलामेंढा ९३ टक्के भरलाविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प १०० टक्के भरला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ९३.४६ टक्के इतक ा भरला आहे. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा एकूण साठा कमी आहे. पोथराची क्षमता ३५ दलघमी तर असोलामेंढाचा ५२.३३ दलघमी इतका साठा आहे.येत्या दिवसात धरण भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २१.७९ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसे झाले नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

 

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई