शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:33 IST

आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यात पाणी टंचाईची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.पावसाळ्याचे दिवस आहे, परंतु काही अपवाद वगळ्यास अजूनही पाऊस पुरेसा झालेला नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात जुलै ६ तारखेला आलेला मुसळधार पाऊस सोडला तर धरणाना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ४ आॅगस्ट रोजी केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी असून यात १२१७.२७ दलघमी (३४.२५ टक्के) इतकाच जलसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात २१९.९० दलघमी म्हणजे २१.६२ टक्के इतका जलसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ६३.५८ टक्के, रामटेकमध्ये ३४.३९ टक्के, लोवर नांद वणा ५३.७४ टक्के, वडगाव ५६.९६ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४७.८ टक्के, सिरपूर २६.९७ टक्के, पुजारी टोला ७५.७६ टक्के, कालीसरार ७०.६९ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ९.९४ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ९३.४६ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना ६४.५२ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.७२ टक्के, धाम ३२.७५ टक्के, पोथरा १०० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २८.८० टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - २८.४ आणि बावनथडी २९.१३ टक्के इतका पाणीसाठा आहे.पोथरा हाऊसफुल्ल, असोलामेंढा ९३ टक्के भरलाविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प १०० टक्के भरला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ९३.४६ टक्के इतक ा भरला आहे. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा एकूण साठा कमी आहे. पोथराची क्षमता ३५ दलघमी तर असोलामेंढाचा ५२.३३ दलघमी इतका साठा आहे.येत्या दिवसात धरण भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २१.७९ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसे झाले नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

 

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई