शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सायकलपटू देणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश, दोन हजार किमीची सायकलयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 08:00 IST

Nagpur News पर्यावरणाबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे ध्येय घेऊन यवतमाळ जिल्ह्यातली एक मुलगी एकटी सायकलने थेट लेह-लद्दाखला निघाली आहे.

विशाल महाकाळकर

नागपूर : पर्यावरणाबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे ध्येय घेऊन यवतमाळ जिल्ह्यातली एक मुलगी एकटी सायकलने थेट लेह-लद्दाखला निघाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आलेली प्रणाली चिकटे ही सायकलपटू शुक्रवारी सकाळी आपल्या सायकलने दिल्लीकडे रवाना झाली. तिथून ती लेह-लद्दाखपर्यंत मजल मारणार आहे.

नागपूर ते दिल्ली हा प्रवास महामार्गाने न करता शक्यतो ग्रामीण भागातून करण्याचा तिचा विचार असून, या संपूर्ण प्रवासात पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांना सांगण्याचा तिचा मानस आहे. याआधी प्रणालीने संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला असून, आजपर्यंत एकूण २५ हजार कि.मी.हून अधिक सायकल चालविली आहे.

यवतमाळच्या वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा खेड्यातून आलेल्या प्रणालीने बी. एस. डब्ल्यू केले आहे. सायकलवरून कन्याकुमारीला जाण्याचे स्वप्न तिच्या मनात होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी तिने कोरोनाकाळात सायकलवरून घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचे काम सुरू केले. जवळपासच्या गावांना सायकलने भेटी देऊन आपल्या निर्धाराला ती खतपाणी घालत राहिली. आधी विदर्भ व नंतर पूर्ण महाराष्ट्रभर ती सायकलवरून फिरली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सायकल हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे ती मानते. भविष्यात तिला संपूर्ण भारत दौरा करायचा आहे. तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करायचे आहे.

'दोन चाकं, ४३५ दिवस' ही डॉक्युमेंटरी

प्रणालीने संपूर्ण महाराष्ट्र सायकलने पिंजून काढला आहे. तिने ४३५ दिवसांत केलेल्या १७ हजारांहून अधिक कि.मी. प्रवासाच्या अनुभवावर, 'दोन चाकं, ४३५ दिवस' हा माहितीपट २०२२ मध्ये निघाला असून त्याला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.

प्रवासात चांगले अनुभव अधिक

एकटी मुलगी सायकलने हजारो कि.मी.चा प्रवास करते म्हटल्यावर उभा राहणारा पहिला प्रश्न सुरक्षेचा असतो. यावर प्रणाली सांगते, असे वाईट अनुभव फारसे आले नाहीत. मध्यंतरी एकदाच एक मोटारसायकलवाला मागे लागला व अपशब्द वापरू लागला होता. त्याला चांगले खडसावले तेव्हा तो मुकाट्याने निघून गेला. मी जिथे जिथे जाते, तिथे लोक स्वागतच करतात. आदराने बोलतात. माहिती विचारतात व मदतही करतात.

सायकलवारीने काय शिकवले

हजारो कि.मी. सायकलवरून जाणे. वाटेतल्या गावातील सरपंचांची भेट घेऊन तेथील विद्यार्थी व नागरिकांना भेटणे. त्यांच्याशी गप्पा मारणे व पर्यावरणाबाबत संवाद साधणे हा प्रणालीचा आवडता कार्यक्रम असतो. या संवादातून आपल्याला आयुष्यातील अनेक चांगल्या बाबींचे आकलन झाल्याचे ती सांगते. यात संवादकला, स्नेहभाव, पर्यावरणवाद आणि धाडस हे गुण ती विशेषत्वाने नमूद करते.

टॅग्स :Socialसामाजिकenvironmentपर्यावरण