शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सायकलपटू देणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश, दोन हजार किमीची सायकलयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 08:00 IST

Nagpur News पर्यावरणाबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे ध्येय घेऊन यवतमाळ जिल्ह्यातली एक मुलगी एकटी सायकलने थेट लेह-लद्दाखला निघाली आहे.

विशाल महाकाळकर

नागपूर : पर्यावरणाबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे ध्येय घेऊन यवतमाळ जिल्ह्यातली एक मुलगी एकटी सायकलने थेट लेह-लद्दाखला निघाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आलेली प्रणाली चिकटे ही सायकलपटू शुक्रवारी सकाळी आपल्या सायकलने दिल्लीकडे रवाना झाली. तिथून ती लेह-लद्दाखपर्यंत मजल मारणार आहे.

नागपूर ते दिल्ली हा प्रवास महामार्गाने न करता शक्यतो ग्रामीण भागातून करण्याचा तिचा विचार असून, या संपूर्ण प्रवासात पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांना सांगण्याचा तिचा मानस आहे. याआधी प्रणालीने संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला असून, आजपर्यंत एकूण २५ हजार कि.मी.हून अधिक सायकल चालविली आहे.

यवतमाळच्या वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा खेड्यातून आलेल्या प्रणालीने बी. एस. डब्ल्यू केले आहे. सायकलवरून कन्याकुमारीला जाण्याचे स्वप्न तिच्या मनात होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी तिने कोरोनाकाळात सायकलवरून घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचे काम सुरू केले. जवळपासच्या गावांना सायकलने भेटी देऊन आपल्या निर्धाराला ती खतपाणी घालत राहिली. आधी विदर्भ व नंतर पूर्ण महाराष्ट्रभर ती सायकलवरून फिरली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सायकल हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे ती मानते. भविष्यात तिला संपूर्ण भारत दौरा करायचा आहे. तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करायचे आहे.

'दोन चाकं, ४३५ दिवस' ही डॉक्युमेंटरी

प्रणालीने संपूर्ण महाराष्ट्र सायकलने पिंजून काढला आहे. तिने ४३५ दिवसांत केलेल्या १७ हजारांहून अधिक कि.मी. प्रवासाच्या अनुभवावर, 'दोन चाकं, ४३५ दिवस' हा माहितीपट २०२२ मध्ये निघाला असून त्याला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.

प्रवासात चांगले अनुभव अधिक

एकटी मुलगी सायकलने हजारो कि.मी.चा प्रवास करते म्हटल्यावर उभा राहणारा पहिला प्रश्न सुरक्षेचा असतो. यावर प्रणाली सांगते, असे वाईट अनुभव फारसे आले नाहीत. मध्यंतरी एकदाच एक मोटारसायकलवाला मागे लागला व अपशब्द वापरू लागला होता. त्याला चांगले खडसावले तेव्हा तो मुकाट्याने निघून गेला. मी जिथे जिथे जाते, तिथे लोक स्वागतच करतात. आदराने बोलतात. माहिती विचारतात व मदतही करतात.

सायकलवारीने काय शिकवले

हजारो कि.मी. सायकलवरून जाणे. वाटेतल्या गावातील सरपंचांची भेट घेऊन तेथील विद्यार्थी व नागरिकांना भेटणे. त्यांच्याशी गप्पा मारणे व पर्यावरणाबाबत संवाद साधणे हा प्रणालीचा आवडता कार्यक्रम असतो. या संवादातून आपल्याला आयुष्यातील अनेक चांगल्या बाबींचे आकलन झाल्याचे ती सांगते. यात संवादकला, स्नेहभाव, पर्यावरणवाद आणि धाडस हे गुण ती विशेषत्वाने नमूद करते.

टॅग्स :Socialसामाजिकenvironmentपर्यावरण