शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : ५२ उमेदवारांच्या सोशल मीडियावर ‘सायबर सेल’चा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 20:30 IST

नागपूर जिल्ह्यातील ५५ उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर होत असल्याने त्यांचे खाते रडारवर आहेत. यांच्याकडून दुष्प्रचार किंवा अपप्रचार झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबल्क एसएमएस, पोस्टवर बारीक नजर : आतापर्यंत तीन उमेदवारांनीच मागितली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या सोशल मीडियाच्या खात्यावर नजर ठेवण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील ५५ उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर होत असल्याने त्यांचे खाते रडारवर आहेत. यांच्याकडून दुष्प्रचार किंवा अपप्रचार झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. तीन उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा उपयोग करण्यासंदर्भात रीतसर परवानगी मागितली आहे.निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांकडून सभा, रॅली, पत्रकाचा उपयोग करण्यात येतो. मागील काही निवडणुकीपासून सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रचारासोबतच विरोधी उमेदवाराच्या दुष्प्रचारासाठीही याचा उपयोग करण्यात येतो. अनेकदा भ्रामक आणि खोटी माहितीही याच्या माध्यमातून करण्यात येते आहे. पक्षातील कार्यकर्त्यांसोबत उमेदवारांच्या खात्यातूनही हा प्रकार होत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून अर्ज भरतानाच उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मीडियावरील खात्याची माहिती घेण्यात आली आहे. या खात्यावर वॉच ठेवण्यात येतो. याकरिता एक ‘सोशल मीडिया सेल'च तयार करण्यात आला आहे. या सेलमध्ये सायबर विभागातील अधिकाऱ्यांसोबतच सायबर तज्ज्ञाचाही समावेश आहे. या सेलमध्ये २१ कर्मचारी कार्यरत आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा जागांकरता १४६ उमेदवार रिंगणात आहे. यातील ५२ उमेदवारांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रचारासाठी बल्क एसएमएसचा वापर झाल्याची बाब आढळून आली आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या खात्यावर सायबर सेलची नजर आहे. या उमेदवारांची प्रत्येक पोस्ट तपासून पाहिली जात आहे. यात आचारसंहिता भंग करणारे साहित्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्याच प्रमाणे प्रचारासाठी सोशल मीडियाचा करण्यासाठी परवानगी देण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन उमेदवारांनी अर्ज केला आहे.प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. चुकीची, बदनामी करणारा मजकूर असल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा प्रकाराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही प्रमाणात बल्क एसएमएसचा वापर झाला असल्याने सायबर सेल अशा उमेवारांवर नजर ठेवून आहे. ५२ उमेदवारांचे खाते सायबर सेलच्या ट्रेकिंगवर आहे.रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया