शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पीककर्जमाफी ठरली डोकेदुखी : हंगामात पैसे आणायचे कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:56 PM

शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीककर्जमाफी देण्याची घोषणा करीत त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना २०१७’ असे गोंडस नाव दिले. वास्तवात, या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कवडीचा फायदा न होता उलट या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी घालण्यात आलेल्या विविध अटींमुळे गळचेपी होत आहे. बँकांनी दीड लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे पत्रांद्वारे तगादा लावला आहे.

ठळक मुद्देविविध अटींमुळे शेतकऱ्यांची गळचेपी

सुनील चरपे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीककर्जमाफी देण्याची घोषणा करीत त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना २०१७’ असे गोंडस नाव दिले. वास्तवात, या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कवडीचा फायदा न होता उलट या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी घालण्यात आलेल्या विविध अटींमुळे गळचेपी होत आहे. बँकांनी दीड लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे पत्रांद्वारे तगादा लावला आहे. पण, शेतकऱ्यांकडे पैसा असता तर त्यांनी कर्जमाफी मागितलीच नसती. दुसरीकडे, हा प्रकार मुद्दाम खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आला. त्यामुळे थकीत कर्जाची उर्वरित रक्कम (एकूण कर्जावरील व्याजासह) भरण्यासाठी शेतकरी ऐन हंगामात पैसा आणणार कुठून, याचा विचार शासन व प्रशासनाने केला नाही.राज्य शासनाने केवळ तोंडदेखलेपणा करण्यासाठी शेतकऱ्यांची पीककर्जमाफी करण्याची घोषणा केली. ‘आॅनलाईन’ अर्ज भरून घेण्यापासून तर सटरफटर कागदपत्र गोळा करून ते सादर करण्यापर्यंचे सोपस्कार शेतकऱ्यांकडून करवून घेतले. सदर अर्ज भरून घेण्यासाठी १७ विविध अटी घालण्यात आल्या. ही ‘आॅनलाईन’ प्रक्रिया जून ते सप्टेंबर २०१७ या काळात पूर्ण करण्यात आली. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून १० ‘ग्रीन लिस्ट’ तयार केल्या. यातील आठ ‘ग्रीन लिस्ट’ची लेखापरीक्षकांकडून पडताळणी करण्यात आली असून, उर्वरित ‘लिस्ट’ची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. त्यातच पात्र लाभार्थ्यांची यादी बँकांकडे पाठविण्यात आली. मध्यंतरी इच्छुकांच्या पीककर्जाचे पुनर्गठणही करण्यात आले.ही कर्जमाफी देताना शासनाने दीड लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली. त्यापेक्षा अधिक कर्ज असल्यास संबंधित शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जाची उर्वरित रक्कम व्याजासह भरण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना ३० जून २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली. हा पैसा गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ २० दिवसांचा अवधी देण्यात आला. या काळात शेतकऱ्याने उर्वरित रकमेचा (व्याजासह) भरणा न केल्यास तो कर्जमाफीस पात्र राहणार नाही, असेही स्पष्टपणे कळविण्यात आले. या काळात पैसा गोळा करून कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना शक्य आहे काय, याचा विचार कुणीही केला नाही.शेतकऱ्यांना नादार घोषित कराशासन प्रसंगी कारखानदारांचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांना नादारीच्या यादीत समाविष्ट करून त्यांच्याकडील कोट्यवधींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेते. सरकार हा निर्णय शेतकºयांच्या बाबतीत का घेत नाही? सततची नापिकी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित न मिळणारा भाव, हमीभाव किंवा आधारभूत किंमत उत्पादन खर्चापेक्षा कमी असणे, शेतमालाची हमीभावाप्रमाणे खरेदी न करणे, शेतीक्षेत्रात पुरेशा पायाभूत सुविधा, प्रक्रिया उद्योग व हक्काच्या बाजारपेठेचा अभाव, निसर्गाचे दुष्टचक्र या बाबींमुळे शेतकरी वर्षानुवर्षे आर्थिक संकटात आहे. त्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. परिणामी, सरकारने शेतकऱ्यांना नादार घोषित करायला काहीच हरकत नसावी. जर उद्योगपतींना नादार करण्याच नियम असेल तर शासनाने शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यास सरकारला आपत्ती नसावी.केवळ स्मरणपत्रशेतकऱ्यांनी कर्जाची उर्वरित रक्कम (व्याजासह) भरण्यासाठी बँकांनी शेतकºयांना जूनच्या दुसऱ्या आठवड्यात स्मरणपत्र पाठविले. खरं तर, बँकांनी स्मरणपत्र देण्यापूर्वी शेतकऱ्यांना आधी त्याच आशयाचे पत्र द्यायला हवे होते. पण तसे केले नाही. ही रक्कम भरण्याची मुदत ३० जून २०१८ असल्याचे स्मरणपत्रात नमूद केले आहे. एखाद्या शेतकऱ्याने सन २०१५-१६ मध्ये जर तीन लाख रुपयांचे पीककर्ज घेतले तर ते आज व्याजासह ४ लाख ७ हजार ५०० रुपयांच्या वर गेले आहे. शेतकऱ्याने दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी उर्वरित म्हणजे २ लाख ५७ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम (व्याज थकबाकी) हंगामात जुळवायची कशी?

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर