शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कापूस उत्पादनाच्या अंदाजातच गाेलमाल, ‘सायकाॅलाॅजिकल प्रेशर’मुळे दरावर दबाव

By सुनील चरपे | Updated: June 5, 2023 12:16 IST

उत्पादनात ४५.१२ लाख गाठींची तफावत : वस्त्राेद्याेगासह शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

सुनील चरपे

नागपूर : देशभरात एकूण २९८.३५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीएआय’ने तर ‘सीओसीपीसी’ने ३४३.४७ लाख गाठींचे उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. या दाेन्ही संस्थांच्या अंदाजात ४५.१२ लाख गाठींची तफावत आहे. त्यामुळे बाजारात सायकाॅलाॅजिकल प्रेशर तयार झाल्याने देशातील वस्त्राेद्याेगासह कापूस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व दरवाढीला ब्रेक लागला आहे.

देशातील वस्त्राेद्याेग व शेतकरी यूएसडीए, सीएआय व सीओसीपीसी या संस्थांच्या कापूस उत्पादन अंदाजावर लक्ष ठेवून असतात. चालू हंगामात देशात ३१२ ते ३१५ लाख गाठी कापसाचा वापर व मागणी आहे. प्रतिकूल हवामान, राेग व किडींचा प्रादुर्भाव आणि सततच्या अतिमुसळधार पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस राेखून धरल्याने बाजारातील आवकही संथ हाेती.

सीओसीपीसीने एप्रिलमध्ये कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त करताच मेमध्ये आवक वाढली व दर घसरले. १ ऑक्टाे. २०२२ ते ३१ मे २०२३ या काळात २५५.५३२ लाख गाठी कापूस बाजारात आला. म्हणजे सीओसीपीसीच्या मते किमान ८७.९७ लाख गाठी, तर सीएआयच्या मते ४२.८२ लाख गाठी कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. सीओसीपीसीच्या अंदाजामुळे बाजारात सायकाॅलाॅजिकल प्रेशर तयार हाेऊन दर दबावात आल्याचे बाजार तज्ज्ञांनी सांगितले.

कापूस उत्पादनाचा अंदाज

यूएसडीए, सीएआय व सीओसीपीसी या प्रमुख संस्था कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त करतात व त्यांच्या अंदाजामुळे बाजार व दर प्रभावित हाेतात. ऑक्टाेबर २०२२ ते मे २०२३ या काळात यूएसडीने त्यांचा कापूस उत्पादन अंदाज ३६२ लाख गाठींवरून ३१३ लाख गाठी, सीएआयने ३७५ लाख गाठींवरून २९८.३५ लाख गाठींवर, तर सीओसीपीसीने ३६५ लाख गाठींवरून ३४३.४७ लाख गाठींवर आणला आहे.

सीओसीपीसीच्या अंदाजात घाेळ

सीओसीपीसीने ऑक्टाेबर २०२२ मध्ये ३६५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. २४ मार्च व २० एप्रिल २०२३ राेजी याच संस्थेने अनुक्रमे ३३७.२३ लाख गाठींचा अंदाज व्यक्त केला हाेता. १ जून २०२३ राेजी या संस्थेने त्यांच्या अंदाजात घट करण्याऐवजी वाढ करून ३४३.४७ गाठींचा अंदाज व्यक्त केला. या संस्थेने महिनाभरात ६.२४ लाख गाठींचे उत्पादन कसे व का वाढणार, हे स्पष्ट केले नाही.

सीएआयचा अंदाज खरा मानला तर दरवाढ हाेणे अपेक्षित हाेते. पण, सीओसीपीसीच्या अंदाजामुळे आवक वाढली व दरवाढीला ब्रेक लावण्यास मदत करणारा ठरला. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरी