शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
2
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
3
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
4
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
5
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
6
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
7
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
8
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
9
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
11
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
12
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
13
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
14
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
15
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
16
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
17
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
18
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
19
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
20
अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक एकजूट होऊ नयेत म्हणून सत्ताधाऱ्यांचे कट-कारस्थान: ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

By आनंद डेकाटे | Updated: January 7, 2026 18:30 IST

Nagpur : राज्यात होणारी बिनविरोध निवड असो वा राजकीय युती बघता संघ व भाजपने छोट्या-मोठया राजकीय पक्षांचे अस्तित्व संपविण्यास सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात होणारी बिनविरोध निवड असो वा राजकीय युती बघता संघ व भाजपने छोट्या-मोठया राजकीय पक्षांचे अस्तित्व संपविण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षांची युती आघाडी होऊच नये, यासाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कटकारस्थान रचले असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला.

महानगर पालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, नागपुरात त्यांची युती, आघाडी होवू शकली नाही. ज्यांची राज्यस्तरीय युती आहे, त्यांचीही टिकली नाही. त्यामुळे भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. आमच्याशी युती नाही तर कुणाशीही नाही, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. त्यासाठी दबावतंत्र, ब्लॅकमेलिंग केले. पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नसले तरी वाटाघाटी दरम्यान जे अनुभव आले, यातून हे दिसते. राजकीय पक्षांच्या अस्तित्वांना आव्हान देण्याचे काम भाजप आणि आरएसएसने सुरू केले आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. राजकीय पक्ष टिकले पाहिजे. नेतेच राहणार नाही, तर प्रश्नांवर आवाज कोण उचलणार, त्यामुळे पक्ष टिकले पाहिजे. त्यासाठी कुणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.

दोन ते अडीज महिन्यात देशात युद्ध

स्वयंघोषीत विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेकेखोरपणामुळे देश युध्दासमोर येऊन ठेपला आहे. परराष्ट्र धोरण पूर्णत: कोलमडले आहे. शेजारच्या पाकिस्तान व बांग्लादेशला हाताशी धरून इतर देश भारताला कोंडीत पकडत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच चीनसंदर्भात पंतप्रधान कार्यालय व लष्कराची वेगवेगळी भूमिका असून येत्या दोन ते अडीज महिन्यात देशाला युध्दाला सामोरे जावे लागेल, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

रशीयाचे तेल भारत विकत आहे. यातून जगभरातील देशांचे भारतासोबत भांडण होत आहे. दरवर्षाला ४४ हजार कोटीचा हा नफा आहे. तो रिलायंस कंपनीच्या तिजोरीत जात असल्याचा आरोप करीत याच व्यवहारातून युक्रेनचे युध्द सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तोट्यातील मेट्रो रेल्वेचा भार महापालिकेवर येणार

पुढील ५ वर्षात मेट्रो रेल्वे मनपाकडे हस्तांतरीत करण्याचे केंद्राचे धोरण आहे. मेट्रो रेल्वे सध्या पावणे दोन हजार कोटीच्या तोटयात आहे. आधीच आथिंक कणा मोडलेल्या मनपाकडे ती हस्तांतरीत झाल्यास साडे पाच हजार कोटीचे बजेट असलेल्या नागपूर मनपाला पावणे दोन हजार कोटीचा तोटा सहन करावा लागेल. हा भार उचलायचा नसेल तर भाजपला मतदान करू नका,असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ruling Party's Conspiracy to Prevent Opposition Unity: Prakash Ambedkar's Criticism

Web Summary : Prakash Ambedkar accuses BJP and RSS of plotting to eliminate smaller parties and prevent opposition unity. He warns of a potential war due to Modi's policies, criticizes the Reliance oil deal, and highlights the financial burden of the Metro on Nagpur Municipal Corporation, urging voters to reject BJP.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnagpurनागपूरBJPभाजपा