शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

अभिजित वंजारी यांचा विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी दावा

By कमलेश वानखेडे | Published: July 12, 2023 1:56 PM

महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांना केली पत्राद्वारे विनंती

नागपूर : काँग्रेसकडूननागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे युवा आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विदर्भातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तेली समाजाला मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे आता तरी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपदी आपल्याला संधी द्यावी, अशी विनंती वंजारी यांनी अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांना पत्र पाठवून केली आहे.

आ.वंजारी यांनी पत्रात म्हटले आहे की, मी डिसेंबर २०२० मध्ये विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला ही प्रतिष्ठेची जागा जिंकता आली. २०१९ ते जून २०२२ पर्यंतच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तेली जाती समाजाला मंत्रीपद दिले गेले नाही. तेली समाज हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समाज आहे. दुसरीकडे भाजपने प्रदेशाध्यक्षपदी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध स्तरावर तेली समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे.

अर्थखाते अजित पवारांकडे नकोच..; बच्चू कडू स्पष्टच बोलले

आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने विधानपरिषदेत काँग्रेस हा विरोधी पक्षातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मी एक चांगला वक्ता असून विधानपरिषदेचा अडीच वर्षांच्या अल्प कालावधीत मी १२५ पेक्षा जास्त वेळा सभागृहातील चर्चेत भाग घेतला आहे. प्रश्न मांडले आहेत. काँग्रेसचा कट्टर समर्थक म्हणून मला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती वंजारी यांनी पत्राद्वारे केली आहे.

शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीमुळे काँग्रेसला बळ

- विधान सभेतील आमदारांपाठोपाठ विधान परिषदेतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांमध्येही फूट पडली आहे. उपसभापती निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विपलव बाजोरिया यांना उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ ८ वर आले आहे. तर राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, विक्रम काळे, अमोल मिटकरी, सतीश चव्हाण अनिकेत तटकरे हे अजित पवार गटात सामील झाल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार) संखाबळ ४ वर आले आहे. काँग्रेसचे ९ सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या मागणीला बळ मिळाले आहे. १७ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापूर्वी या विषयावर मार्ग निघाला, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAbhijit Wanjariअभिजीत वंजारीcongressकाँग्रेसnagpurनागपूर