शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

राष्ट्रपती राजवटीबद्दल काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार - नाना पटोले

By कमलेश वानखेडे | Published: July 13, 2023 6:17 PM

भाजपने महाराष्ट्राला कलंक लावल्याची टीका

नागपूर : महायुती सरकारमध्ये मंत्र्यांची नियुक्ती झाली मात्र खाते वाटपामध्ये कोणाला कोणते खाते मिळणार यावर चर्चा सुरू आहे. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. राष्ट्रपती व राज्यपाल यांनी यात तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे. भीती दाखवून विरोधकांना दाबण्याची भीती सरकार दाखवत आहे. यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. एकूणच परिस्थीती पाहता भाजपने महाराष्ट्राला कलंक लावला असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेसतर्फे राज्यपालांना निवेदन देऊन केली जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, जनतेला कुणाकडे कोणते खाते आहे याचे काही देणेघेणे नाही. हे जनतेला लुटणारे सरकार झाले आहे. अनेक भागात पेरणे झाले नाही. अवकाळी पावसाची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांना लुटायला निघाले आहेत. नकली टीम करून कृषी केंद्रावर आपलाच अधिकारी पाठवायचे व लुटायचे, असे सुरू आहे. वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. एक मंत्री सहा सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री राहत असेल तर शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

काँग्रेस विरोधीपक्ष नेत्याबाबत अध्यक्षांना पत्र देईल

- ज्याचे संख्याबळ जास्त त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. ही एक पद्धत आहे. दोन्ही सभागृहात ते संख्याबळ काँग्रेसजवळ आहे. यात मतदान होत नाही. विधानसभा अध्यक्षांना घोषणा करावी लागते. आता काँग्रेस पक्षाला निर्णय घ्यायचा आहे. १७ जुलैला अधिवेशन सुरू होत आहे. त्या दिवशी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते पदाचे पत्र अध्यक्ष व सभापतींना दिले जाईल. हायकमांडकडून निश्चित होणाऱ्या आमदाराचे नाव दिले जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या ३० जागांवर फोकस

- राज्यातील लोकसभेच्या ३० जागांवर फोकस केला आहे. त्यांची ए, बी अशी कॅटेगरी केली आहे. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांना बोलवून त्यांच्याकडून लोकसभेच्या तयारीची माहिती घेतली. कोर कमिटीच्या चार-पाच मीटिंग झाल्या. नवीन लोकांची नेमणूक करून लोकसभेची तयारी सुरू केली आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

मुंडे भगिनी अनुपस्थित, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न

- भाजपच्या मुंबईतील बैठकीला मुंडे भगिनी अनुपस्थित असल्याकडे लक्ष वेधले असता हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे पटोले म्हणाले. याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा म्हणजे त्यांच्या काय भावना आहेत हे समजून येईल. भाजपचे नेते उद्या काँग्रेसमध्ये गेले, असे खडसे बोलले होते. हा त्यांचा इशारा सूचक होता. मी दावा करणार नाही, पण वेळेवर सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील, असे सूचक वक्तव्यही पटोले यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाPresident Ruleराष्ट्रपती राजवट