शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जब जब मोदी डरता है, ईडी सामने करता है; नागपुरात काँग्रेसचे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 13:27 IST

काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले.

नागपूर : केंद्रातील मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांविरोधात प्रदेश काँग्रेसच्यावतीने आज (दि. १३), राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात झाली आहे. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. जब जब मोदी डरता है, ईडी सामने करता है, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी, काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले.

केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी विरोधी धोरणासह काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व नेते खा. राहुल गांधी यांना हेतूपुरस्सरपणे सक्तवसुली संचालनालयाची नोटीस (ईडी) बजावल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत तर नागपुरात ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून काँग्रेसचे इतर नेते दाखल झाले आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुनील देशमुख, माजी आमदार वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, अविनाश राजूरकर आदी आंदोलनस्थळी पोहोचले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. 

दरम्यान, 'नॅशनल हेराल्ड'शी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. तपास एजन्सीने यापूर्वी राहुल गांधींना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगून हजर राहण्यासाठी आणखी दिवसांची मुदत मागितली. याच प्रकरणी तपास यंत्रणेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी त्यांना ८ जून रोजी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, काँग्रेस अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने वेळ मागितला आहे. राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले असून याविरोधात काँग्रस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयnagpurनागपूरNitin Rautनितीन राऊत