शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

संचार व जमावबंदी शहरापुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर केली आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे पालन काही प्रमाणात केवळ शहरात केले जात असून, ग्रामीण भागात मात्र या निर्णय व उपाययाेजनांचा फज्जा उडाला आहे. वास्तवात, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात काेराेना संक्रमणाचा वेग थाेडा अधिक आहे. परंतु या गंभीर प्रकाराकडे कुणीही लक्ष द्यायला व ग्रामीण भागातील नागरिक जबाबदारीने वागायला तयार नाहीत.

सध्या रामटेक शहरात ८९२, तर तालुक्यातील ग्रामीण भागात २,३९४ काेराेना संक्रमित रुग्ण आहेत. या आकडेवारीवरून ग्रामीण भागात काेराेना संक्रमण अधिक असल्याचे स्पष्ट हाेते. मात्र, ग्रामीण भागात सुविधांच्या अभावासाेबत बंधनही फार कमी आहेत. काेराेना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिक विनाकारण घराबाहेर पडणार नाही, अशी प्रशासनाने व्यवस्था करणे तसेच संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची व त्यांचे संक्रमण पसरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आराेग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जीव धाेक्यात टाकून अहाेरात्र कर्तव्य बजावत आहेत.

रामटेक तालुक्यात एकूण १५६ गावे आहेत. यातील बहुतांश गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात काेराेनाचे रुग्ण आहेत. त्या रुग्णांना याेग्य मार्गदर्शन करायला व त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्येसाेबत मृत्युदरात वाढ हाेत आहे. शिवाय, ग्रामीण भागातील नागरिक कुणाचे काहीही ऐकत नाहीत. त्यांच्या असल्या बेजबाबदार वागण्याला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागात पाेलिसांची गस्त वाढविणे आणि संबंधितांवर माेठी दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.

रामटेक शहरात काेराेना केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, त्यात ऑक्सिजन व औषधांची सुविधा करणे अत्यावश्यक आहे. साेबतच गंभीर रुग्णांवर नागपूर शहरात उपचार करण्याची तसेच त्यांना नेण्यासाठी अद्यावत रुग्णवाहिकांची साेय करणेही गरजेचे आहे. ग्रामीण भागात काेराेना संक्रमित नागरिकांना त्यांच्या घरी गृहविलगीकरणात ठेवण्यापेक्षा त्यांची गावातील शाळा अथवा समाजभवनात कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली व्यवस्था करणे आवश्यक असल्याने काहींनी सांगितले आहे.

...

आराेग्य कर्मचाऱ्यांना लागण

ग्रामीण भागातील नागरिकांसाेबतच आराेग्य विभागाचे कर्मचारी व आशासेविकांना काेराेनाची लागण व्हायला सुरुवात झाली आहे. खरं तर, हे कर्मचारी सर्वाधिक काळजी घेतात. पंचाळा (बु.) येथील आशासेविका काेराेना संक्रमित असल्याचे आढळून येताच काेराेना तपासणीचे काम अंगणवाडीसेविकेला देण्यात आले. मात्र, सुरक्षा किट देण्यात आली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांंसह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.