शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

बौद्धिक उन्नयनासाठी अभिजात कला महत्त्वाची : शिशिर वर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 10:53 PM

सामान्यत: अभिजात कलेला कंटाळवाणे समजले जाते व तिच्यापासून दूर राहिले जाते. पण हा पूर्वग्रहांनी दूषित गैरसमज आहे. अभिजात कलेच्या संस्काराशिवाय मनुष्य परिपक्व होत नाही. माणसाच्या शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक उन्नयनासाठी अभिजात कलेशिवाय पर्याय नाही, असे मनोगत प्रा. शिशिर वर्मा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनाट्य परिषदेच्या महानगर शाखेचा वर्धापनदिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्यत: अभिजात कलेला कंटाळवाणे समजले जाते व तिच्यापासून दूर राहिले जाते. पण हा पूर्वग्रहांनी दूषित गैरसमज आहे. अभिजात कलेच्या संस्काराशिवाय मनुष्य परिपक्व होत नाही. माणसाच्या शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक उन्नयनासाठी अभिजात कलेशिवाय पर्याय नाही, असे मनोगत प्रा. शिशिर वर्मा यांनी व्यक्त केले.अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या वेळी ‘अभिजात कला आणि मी’ या विषयावर प्रा. वर्मा यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चणाखेकर, महेश पातूरकर, सांरग अभ्यंकर, किशोर भांदककर, दिलीप म्हैसाळकर, महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. नीलकांत कुलसंगे, देवेंद्र लुटे, लेखिका कांचन भुताड, कथा लेखिका चित्रा शर्मा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. शिशिर वर्मा पुढे म्हणाले, अभिजात कला प्राथमिक पातळीवर अनाकलनीय असू शकत नाही. ती आशयघन,अर्थघन व भावघन असते. प्रकृतीइतकीच सहजसुंदर व निरागस असते. कलावंतांच्या हृदयापासून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची ताकद तिच्यामध्ये असते. तिचा संबंध भावनांशी असल्याने स्वत:ला विसरून तिच्या प्रवाहात झोकून देत तिच्यात समरस होण्याची गरज असते. दृष्टीची, विचारांची व संकल्पनांची स्पष्टता हा श्रेष्ठ कलाकारांमध्ये असलेला महत्त्वाचा गुण होय. महान कलाकार केवळ एक मर्यादित वस्तुविशेष घडवत नाही तर तो एका स्वायत्त सृष्टीची रचना करतो. श्रेष्ठ कलाकृतीत काही सुधारणा करता येत नाही. तिच्यात केलेला प्रत्येक बदल ठिगळाप्रमाणे तिला कुरुप आणि कलंकित करतो. कलेच्या सागरात इतिहास, धर्म, विज्ञान, नीतीशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र आदी सर्वच विषयांचे प्रवाह विसर्जित होतात आणि मोक्ष पावतात. ज्यामुळे कलावंत व रसिकही मानसिकरीत्या अधिक मजबूत, भावनिकरीत्या अधिक स्थिर, संवेदनशील आणि विवेकी बनतो. कला माणसाला निकोप आणि सुदृढ बनवते, अशी भावना त्यांनी मांडली.संचालन सौरभ दास यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिन गिरी यांनी केले. आयोजनात शाखेच्या प्रमुख कार्यवाह पूजा पिंपळकर भोयर, सारनाथ रामटेके आणि राजेश काळे व शाखेच्या सदस्यांचा सहभाग होता.नाटक जगविणे हाच उद्देशनाट्य परिषदेच्या जुन्या शाखेत स्थान मिळत नसल्याने काही कलावंतांनी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे नवीन शाखा निर्माण करण्याची मागणी केली. महानगरामध्ये तीन शाखा ठेवण्याची तरतूद नाट्य परिषदेच्या घटनेमध्ये आहे. त्यानुसार २०१५ मध्ये अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांनी महानगर शाखेला परवानगी दिली व या शाखेची स्थापना झाली. त्यावेळी १०० सदस्य होते. आज शाखेमध्ये नागपूरसह भंडारा, वर्धा, उमरेड व वडसा झाडीपट्टीचेही कलावंत जुळले असल्याचे शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी सांगितले. वर्षाला १० कार्यक्रम घडवून आणायचे हा नित्यक्रम. नाटक वाढले पाहिजे हाच शाखा स्थापनेमागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Natakनाटकnagpurनागपूर