शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळांत राबविणार बाल स्वच्छता मोहीम

By admin | Updated: November 13, 2014 00:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत के स्वच्छ विद्यालय मोहीम सुरू केली आहे. शाळा हे शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने बालकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पालक

१४ ते १९ दरम्यान विविध कार्यक्र म : सेवाभावी संस्थांचे सहकार्यनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत के स्वच्छ विद्यालय मोहीम सुरू केली आहे. शाळा हे शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने बालकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पालक व समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान शाळांतून बाल स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार महापालिका शाळांतून ही मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती शिक्षण सभापती चेतना टांक यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. १४ नोव्हेंबर या बालक दिनापासून मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. यानिमित्ताने आठवडाभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात स्वच्छ शाळा व स्वच्छ परिसर, स्वच्छ व संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ शौचालय उपक्रमांचा समावेश आहे.जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्य, प्रभातफेरी, घनकचरा व्यवस्थापन आदी उपक्र म राबविण्यात येणार आहे. शासनाचे आदेश म्हणून नव्हे तर शालेय विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, यासाठी महापौर प्रवीण दटके यांनी बैठक घेतली. स्वच्छ शाळेला महापौर चषक प्रदान केला जाणार असून, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहे. शाळांमध्ये अस्वच्छता होणार नाही, यासाठी मुख्याध्यापकांनी सतर्क राहण्याचे आदेश आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले आहे. मनपाच्या २८ माध्यमिक व १६६ प्राथमिक शाळांतून ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेला जेसीआय आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. मोहीम संपल्यानंतर दर १५ दिवसांनी शाळांना भेट देण्याची सूचना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी बैठकीत केली. विद्यार्थ्यांना जेसीआय व ग्रीन व्हिजिल व्याख्यान व पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार. तसेच मनपाच्या आरोग्य विभागातर्फे घर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. पत्रपरिषदेला परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, डॉ. कविता रतन यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)