शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

राज्यात बालमृत्यूचा दर घसरतोय : आरोग्यमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 8:17 PM

राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्देइस्पितळात दाखल नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण ८ टक्क्यांवर

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. हेमंत टकले, शरद रणपिसे, संजय दत्त इत्यादी सदस्यांनी या मुद्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती.केंद्र शासनाच्या ‘एसआरएस’ या सर्वेक्षणानुसार राज्यातील बालमृत्यूचा दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. नवजात बालकांवर उपचारासाठी राज्यात त्रिस्तरीय योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्रसूतीगृह व शस्त्रक्रियागृहामध्ये ‘न्यू बॉर्न केअर कॉर्नर’, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयस्तरावर ‘न्यू बॉर्न स्टॅबिलायझेशन युनिट’ आणि जिल्हा रुग्णालयस्तरावर ‘स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट’ कार्यरत आहे. राज्यात सद्यस्थितीत ३६ ‘एसएनसीयू’ कार्यान्वित असून, दरवर्षी ५० हजारांहून अधिक बालकांवर उपचार करण्यात येतात. २०११-१२ मध्ये येथील मृत्यूंचे प्रमाण १२ टक्के इतके होते. आॅक्टोबर २०१७ मध्ये हेच प्रमाण ८ टक्क्यांवर आले असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.नाशिकमध्ये आॅगस्ट महिन्यात ३४५ नवजात बालके दाखल झाली व यातील ५५ बालकांचा मृत्यू झाला. अपुऱ्या दिवसाचे बाळ, जन्मत: श्वसनावरोध, श्वसनाचा आजार, जंतूसंसर्ग इत्यादी कारणांमुळे हे मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Healthआरोग्य