शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

मेळघाटात दररोज एक बालक मरणाच्या वाटेवर : बंडे साने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 11:38 PM

मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अ‍ॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.

ठळक मुद्दे१९९३ पासून १४२५५ बालकांचा मृत्यू : व्यवस्थेची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अ‍ॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.मेळघाटमध्ये गेल्या २५ वर्षात कुपोषणामुळे झालेले बालमृत्यू, उपजतमृत्यू व मातामृत्यूची समस्या गंभीर आहे. याबाबत अनेक संघटनांनी, कार्यकर्त्यांनी निवेदन दिली, मोर्चे काढले, उपोषण केली परंतु, सरकारी अनास्थेमुळे अद्यापही प्रश्न कायम आहे. अनेक मंत्री, आमदार, खासदार, वैद्यकीय अधिकारी, मोठमोठी नेते, अशा सर्वांनी मेळघाटला भेटी दिल्या व परिस्थिती जाणली. तरीही ही समस्या सुटू नये हे कोडेच असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार १९९३ ते २०१८ या काळात मेळाघाटात १४,२५५ बालमृत्यू झाले. उपजतमृत्यूची संख्या ३८४३ आहे तर वैद्यकीय अहवालानुसार गेल्या १८ वर्षात २२६ मातांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. एकतर सरकारकडून जाणीपूर्वक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे किंवा योजना राबविणाऱ्या प्रशासनाकडून सरकारची धूळफेक केली जात असल्याचा आरोप साने यांनी केला. कुपोषणाचे भीषण वास्तव डोळ्यासमोर असताना आवश्यक त्या सोईसुविधा भागापर्यंत न पोहचणे ही शोकांतिका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मेळघाटात सोनोग्राफीची सोय नाही, एकही रक्तपेढी नाही, हव्या तेवढ्या प्रमाणात बालरोग तज्ज्ञ, प्रसुती तज्ज्ञ उपलब्ध होत नाही, भूलतज्ज्ञांचीही सेवा आणि दर्जेदार आरोग्य सुविधा येथील नागरिकांसाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत समस्या सुटेल ती कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनात आमदारांनी मेळघाटाच्या समस्यांकडे लक्ष वेधावे आणि सकारात्मक प्रतिसाद देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला अ‍ॅड. दशरथ बावनकर, ललिता बेठेकर, अनिल राजने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Melghatमेळघाटnagpurनागपूर