शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

मुख्यमंत्री स्वबळावर सरकार खेचत आहे; जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 2:41 PM

केंद्राच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वबळावर सरकार खेचत असून मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी मजा घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत मांडला सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौथ्या वर्षातही राज्य सरकारची कामगिरी दिसत नाही. आर्थिक धोरणे सपशेल अपयश ठरलेली आहेत. कर्जमाफीची घोषणा करण्यात आली परंतु शेतकऱ्यांना लाभ झालेला दिसत नाही. प्रकल्पांच्या बाबतही अशीच अवस्था आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव लिटरमागे १० रुपयांनी अधिक आहे. केंद्राच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वबळावर सरकार खेचत असून मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी मजा घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.केंद्र व राज्य सरकारमधील अस्वस्थता विचारात घेता लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका एकत्रित घेणार नाही. दोन्ही निवडणुका एकत्रित घेतल्यातर लोकसभेच्याही जागा कमी होतील अशी भाजपा नेत्यांना भिती आहे. या देशात जेव्हाजेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. तेव्हातेव्हा मतदारांनी सत्ता बदल घडविला.. देशात अशीच परिस्थिती आहे. पुरोगामी विचाराचे राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भाजपा सारख्या जातीयवादी पक्षासोबत कधीही जाणार नाही. आपले राजकीय स्थान बळकट करण्यासाठी पवार यांच्यावर आरोप केले जातात. गोपीनाथ मुुंडे, गो.रा. खैरनार यांनी असेच आरोप केले होते. आता डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. वास्तविक भिमा कोरेगाव घटना घडताच हे मनुवाद्यांचे षडयंत्र असल्याचे पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.संभाजी भिडे तरुणांची डोकी भडकावण्याचे काम करतात. फुले, शाहू व आंबेडकरांवर ते कधी बोलत नाही. खा. उदयनराजे भोसले म्हणतात ते उच्च शिक्षित आहेत. परंतु ते शिकले कि ती आहे. त्यांनी कोणत्या पदव्या घेतलेल्या आहे. याचा भिडे यांनी जाहीर खुलासा करावा, असे आव्हाण देत भाजपाच्या राज्यात त्यांना अटक होण्याची शक्यता नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. भिमा कोरेगाव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी हा फार्स आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. पंतप्रधात नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणाचा आजच्या परिस्थितीशी कोणताही संबंध नाही. त्यांनी चुकीचा इतिहास जनतेपुढे मांडला. मोदी देश सांभाळू शकतात तर मग अखिल भारतीय काँग्रेसचे अध्ययक्ष राहूल गांधी देश का सांभाळू शकणार नाहीत. असा सवाल आव्हाड यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस