शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

‘नेट’च्या निकषाला आव्हान विद्यार्थ्यांना नाकारला दिलासा

By admin | Updated: January 14, 2015 00:46 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित असल्यामुळे ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’ (नेट)संदर्भातील वादग्रस्त अधिसूचना रद्द करण्याची याचिकाकर्त्या

हायकोर्ट : सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित असल्यामुळे ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’ (नेट)संदर्भातील वादग्रस्त अधिसूचना रद्द करण्याची याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांची विनंती अमान्य केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सकारात्मक आल्यास नवीन याचिका दाखल करण्याची विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली आहे.
जून-२०१२ मध्ये झालेल्या नेट परीक्षेतील तीन पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अनुक्रमे ३५, ३५, ४०, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३५, ३५, ४५, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४०, ४०, ५० गुण मिळविणे आवश्यक होते. ही परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने वादग्रस्त अधिसूचना काढून उत्तीर्णचे निकष बदलवून तीन पेपरमध्ये, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांना सरासरी ५५ टक्के, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरासरी ६० टक्के, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरासरी ६५ टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले.
या अधिसूचनेविरुद्ध पूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या होत्या. उच्च न्यायालयाने याचिका स्वीकारून अधिसूचना रद्द केली होती. या निर्णयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाची याचिका मंजूर केली होती.
तसेच, विद्यार्थ्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही फेटाळली होती. यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एक याचिका दाखल केली असून ती याचिका प्रलंबित आहे. नागपूर विद्यापीठातर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील व अ‍ॅड. अमित अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)