शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

'सीएम'च्या बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार 'ट्रिक' की देवेंद्र फडणवीसांची 'हॅटट्रिक'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 16:19 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो.

ठळक मुद्देगटबाजी टाळणार कशी ? भाजपा कार्यकर्त्यांचा मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो. येत्या विधानसभा निवडणुकांत भाजपाकडून मुख्यमंत्री येथून लढतील असेच अंदाज लावण्यात येत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसकडून प्रफुल्ल गुडधे यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु मतदारसंघात असलेल्या गटबाजीचा सामना करण्याचे मोठे आव्हानच कॉंग्रेससमोर राहणार आहे.२००९ साली विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाची निर्मिती झाली. पश्चिम नागपुरातील बराचसा भाग यात आला व यात प्रामुख्याने पांढरपेशा वस्ती अशी ओळख असलेल्या भागाचे प्रमाण मोठे होते. सद्यस्थितीत या मतदारसंघात भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव अंतिम मानण्यात येत आहे. इतर कुठल्याही नेत्याने तेथे उमेदवारीसाठी दावादेखील केलेला नाही. परंतु जर ऐनवेळी पक्षाने मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून निवडणूक लढावी असे ठरविले तर मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्यावर विश्वास टाकला जाऊ शकतो.कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनाच परत उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसकडून कुमार बोरकुटे, उमेश शाहू, गणेश कश्यप, डॉ.गजराज हटेवार यांनीदेखील अर्ज घेतले आहेत. आता यातील नेमके किती जण प्रत्यक्ष उमेदवारीसाठी दावा करतात हा प्रश्नच आहे. परंतु या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी हा कॉंग्रेससमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. २०१७ मधील मनपा निवडणुकांत प्रभाग ३८ मध्ये लढण्यासाठी प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी दावा केला होता. त्यामुळे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना दुसºया प्रभागातून लढावे लागले. निवडणुकीला दोन वर्ष झाली असली तरी पक्षात अंतर्गत धुसफूस कायमच आहे. त्यामुळे विधानसभेसाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एकजूट करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.याशिवाय बसपाकडूनदेखील या मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. बसपाकडून उषा बौद्ध, अशोक डोंगरे, विवेक हाडके, नवनीत धाबाडे, सदानंद जामगडे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

‘ग्रॅन्ड हॅट्ट्रिक’साठी प्रयत्नदेवेंद्र फडणवीस हे सातत्याने चार वेळा विधानसभा निवडणुकात विजयी झाले असले तरी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील ही त्यांची तिसरी निवडणूक राहणार आहे. मतदारसंघातील पहिल्याच निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी २७ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला होता तर २०१४ मधील निवडणुकांत ते ५८ हजार ९४२ मतांनी निवडून आले होते. लोकसभा निवडणुकांत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना या मतदारसंघात ५५ हजार ११६ इतके मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराच्या मतांची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत आणखी वाढावी व येथे ‘ग्रॅन्ड हॅट्ट्रिक’ व्हावी यासाठी कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. संघटन पर्वाच्या माध्यमातून नवीन मतदारनोंदणीवरदेखील भर देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री स्वत: ठेवतात लक्षदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची जबाबदारी असली तरी वेळात वेळ काढून ते दक्षिण-पश्चिम नागपुरातील समस्या, येथील विकासकार्य यावर जातीने लक्ष ठेवतात. या मतदारसंघातील पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडून ते नियमितपणे आढावा घेतात. या मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाले आहे. तसेच येथील मूलभूत समस्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. लोकसभा निवडणुकानंतर मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन आढावा घेतला होता व विधानसभेसाठी कार्याची दिशा ठरवून दिली होती. दुसरीकडे कॉंग्रेसकडूनदेखील या भागात जनसंपर्कावर भर देण्यात येत आहे. मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते मतदारांशी संपर्क ठेवून आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019