शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ब्राम्हणवादाला खतपाणी घालणाऱ्या महिलाच! नंदकुमार बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 21:22 IST

जुन्या रूढीपरंपरांचा वारसा पुढे नेण्यात महिलाच अग्रेसर राहिल्या आहेत. ब्राह्मणवादी परंपरांना खतपणी घालण्याचे प्रमुख कार्य महिलांनीच केले आहे.

ठळक मुद्देओबीसी महिला साहित्य संमेलनाचा समारोपरूढीपरंपरांचा वारसा स्त्रियांनी नाकारावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या रूढीपरंपरांचा वारसा पुढे नेण्यात महिलाच अग्रेसर राहिल्या आहेत. ब्राह्मणवादी परंपरांना खतपणी घालण्याचे प्रमुख कार्य महिलांनीच केले आहे. त्यामुळे, आधी हा वारसा महिलांनी नाकारावा. त्याची सुरुवात नागपुरातून या संमेलनाच्या निमित्ताने झाली असल्याची भावना छत्तीसगड येथील ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार बघेल यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्यावतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथे पार पडलेल्या द्विदिवसीय पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर छत्तीसगड येथील राजदा संपत्ती मंडळाचे अध्यक्ष विवेक वासनिक, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, ओबीसी लेखिका रेखा ठाकूर, डॉ. शरयू तायवाडे, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे उपस्थित होते.रूढीपरंपरा स्त्रियांनी नाकारल्या तरच त्या संपुष्टात येतील. या संमेलनाच्या निमित्ताने तसे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. ज्या ब्राह्मणवादी विचारधारेने महिलांना अजूनही मंदिर प्रवेश नाकारला, त्याच विचाराचा वारसा टिकविण्याचे कारण नाही. जगात रामासारखी दुसरी दुष्ट व्यक्ती नाही. ज्या रामाने स्वत:च्या पत्नीला सन्मानजनक वागणूक दिली नाही, तो आदर्श कसा होऊ शकतो, असा सवालही बघेल यांनी यावेळी उपस्थित केला. ‘युद्ध नको बुद्ध हवा’ या घोषणेची गर्जना ओबीसी महिलांनी संपूर्ण देशात करावी आणि खऱ्या क्रांतीला सुरुवात करावी, असे आवाहन बघेल यांनी यावेळी केले.संमेलनाध्यक्ष विजया मारोतकर यांनी समारोपीय भाषणात सर्वमताने ठराव पारित केल्याचे जाहीर केले. अ‍ॅड. समीक्षा गणेशे आणि अ‍ॅड. रेखा बाराहाते यांनी ठरावांचे वाचन केले. प्रा. माधुरी गायधनी यांनी संचालन केले.यावेळी, सुषमा भड, अरुणा भेंडे, प्रज्वला तट्टे, नंदा देशमुख, अ‍ॅड. अंजली साळवे, कल्पना मानकर, अवंतिका लेकुरवाळे, प्रा. संध्या राजूरकर, प्रा. माधुरी गायधनी, निर्मला मानमोडे, उषा देशमुख, मीना भागवतकर, अर्चना बरडे, अरुणा भोंडे, अनिता ढेंगरे, साधना बोरकर, प्रा. डॉ. वीणा राऊत, प्रांजल ताल्हन, लक्ष्मी सावरकर, कुमुद वर्षे, उषा माहुरे, उज्वला महाले, शुभांगी घाटोळे, प्रांजल वाघ उपस्थित होते.बाबासाहेबांनी दिला दलितांना राजसन्मान - विवेककुमार वासनिकडॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच दलिताना राजसन्मान मिळत आहे. छत्तीसगडमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. संविधानाचे विवेचन करण्याची क्षमता राज्यकर्त्यांमध्ये नाही. महिलाच समाजाला पुढे नेणार असून, याची ठिणगी या संमेलनातून पडली असल्याचे विवेककुमार वासनिक यावेळी म्हणाले.साहित्यातून वास्तववादी लिखाण व्हावे - शरयू तायवाडेसंत साहित्यासह आधुनिक साहित्यातही महिलांनी मोठे लिखाण केले आहे. वर्तमानातही वास्तववादी लिखाणावर महिलांनी भर द्यावा. प्रस्थापितांच्या व्यासपीठावर बहुजन महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली जात नसल्याने, ओबीसी महिलांनी स्वत:चे व्यासपीठ निर्माण करावे, असे आवाहन डॉ. शरयू तायवाडे यांनी यावेळी केले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीWomenमहिलाliteratureसाहित्य