शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ब्राम्हणवादाला खतपाणी घालणाऱ्या महिलाच! नंदकुमार बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 21:22 IST

जुन्या रूढीपरंपरांचा वारसा पुढे नेण्यात महिलाच अग्रेसर राहिल्या आहेत. ब्राह्मणवादी परंपरांना खतपणी घालण्याचे प्रमुख कार्य महिलांनीच केले आहे.

ठळक मुद्देओबीसी महिला साहित्य संमेलनाचा समारोपरूढीपरंपरांचा वारसा स्त्रियांनी नाकारावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या रूढीपरंपरांचा वारसा पुढे नेण्यात महिलाच अग्रेसर राहिल्या आहेत. ब्राह्मणवादी परंपरांना खतपणी घालण्याचे प्रमुख कार्य महिलांनीच केले आहे. त्यामुळे, आधी हा वारसा महिलांनी नाकारावा. त्याची सुरुवात नागपुरातून या संमेलनाच्या निमित्ताने झाली असल्याची भावना छत्तीसगड येथील ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार बघेल यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्यावतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथे पार पडलेल्या द्विदिवसीय पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर छत्तीसगड येथील राजदा संपत्ती मंडळाचे अध्यक्ष विवेक वासनिक, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, ओबीसी लेखिका रेखा ठाकूर, डॉ. शरयू तायवाडे, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे उपस्थित होते.रूढीपरंपरा स्त्रियांनी नाकारल्या तरच त्या संपुष्टात येतील. या संमेलनाच्या निमित्ताने तसे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. ज्या ब्राह्मणवादी विचारधारेने महिलांना अजूनही मंदिर प्रवेश नाकारला, त्याच विचाराचा वारसा टिकविण्याचे कारण नाही. जगात रामासारखी दुसरी दुष्ट व्यक्ती नाही. ज्या रामाने स्वत:च्या पत्नीला सन्मानजनक वागणूक दिली नाही, तो आदर्श कसा होऊ शकतो, असा सवालही बघेल यांनी यावेळी उपस्थित केला. ‘युद्ध नको बुद्ध हवा’ या घोषणेची गर्जना ओबीसी महिलांनी संपूर्ण देशात करावी आणि खऱ्या क्रांतीला सुरुवात करावी, असे आवाहन बघेल यांनी यावेळी केले.संमेलनाध्यक्ष विजया मारोतकर यांनी समारोपीय भाषणात सर्वमताने ठराव पारित केल्याचे जाहीर केले. अ‍ॅड. समीक्षा गणेशे आणि अ‍ॅड. रेखा बाराहाते यांनी ठरावांचे वाचन केले. प्रा. माधुरी गायधनी यांनी संचालन केले.यावेळी, सुषमा भड, अरुणा भेंडे, प्रज्वला तट्टे, नंदा देशमुख, अ‍ॅड. अंजली साळवे, कल्पना मानकर, अवंतिका लेकुरवाळे, प्रा. संध्या राजूरकर, प्रा. माधुरी गायधनी, निर्मला मानमोडे, उषा देशमुख, मीना भागवतकर, अर्चना बरडे, अरुणा भोंडे, अनिता ढेंगरे, साधना बोरकर, प्रा. डॉ. वीणा राऊत, प्रांजल ताल्हन, लक्ष्मी सावरकर, कुमुद वर्षे, उषा माहुरे, उज्वला महाले, शुभांगी घाटोळे, प्रांजल वाघ उपस्थित होते.बाबासाहेबांनी दिला दलितांना राजसन्मान - विवेककुमार वासनिकडॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच दलिताना राजसन्मान मिळत आहे. छत्तीसगडमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. संविधानाचे विवेचन करण्याची क्षमता राज्यकर्त्यांमध्ये नाही. महिलाच समाजाला पुढे नेणार असून, याची ठिणगी या संमेलनातून पडली असल्याचे विवेककुमार वासनिक यावेळी म्हणाले.साहित्यातून वास्तववादी लिखाण व्हावे - शरयू तायवाडेसंत साहित्यासह आधुनिक साहित्यातही महिलांनी मोठे लिखाण केले आहे. वर्तमानातही वास्तववादी लिखाणावर महिलांनी भर द्यावा. प्रस्थापितांच्या व्यासपीठावर बहुजन महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली जात नसल्याने, ओबीसी महिलांनी स्वत:चे व्यासपीठ निर्माण करावे, असे आवाहन डॉ. शरयू तायवाडे यांनी यावेळी केले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीWomenमहिलाliteratureसाहित्य