शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नागपुरात पिकविला ‘ब्लॅक राईस’ : राज्यातील पहिलाच प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 21:34 IST

पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीने होणारी भात शेती शेतकऱ्यांना परवडेनाशी झाली आहे. या निराश शेतकऱ्यांच्या जीवनात आता ‘ब्लॅक राईस’ने आशेचे किरण आणले आहे. कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या व औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’च्या (काळा तांदूळ) उत्पादनाचा राज्यातील पहिला प्रयोग नागपूर जिल्ह्यात यशस्वी ठरला आहे.

ठळक मुद्देशेतकरी गटामार्फत ७० एकरवर उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीने होणारी भात शेती शेतकऱ्यांना परवडेनाशी झाली आहे. या निराश शेतकऱ्यांच्या जीवनात आता ‘ब्लॅक राईस’ने आशेचे किरण आणले आहे. कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या व औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’च्या (काळा तांदूळ) उत्पादनाचा राज्यातील पहिला प्रयोग नागपूर जिल्ह्यात यशस्वी ठरला आहे.पारंपरिक भात पिकापासून १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या आत्मांतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा ७० एकरामध्ये राबविण्यात आला. ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगडमधून मागविण्यात आले. सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या उपक्रमासाठी १० बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. ११० दिवसात उत्पादन घेतल्या जात असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेही शक्य झाले आहे. ‘ब्लॅक राईस’ भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिल सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक श्रीमती डॉ. नलिनी भोयर यांनी दिली. ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदभार्तील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार आहे.चीन व उत्तर पूर्व राज्यात होते उत्पादनदैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदुळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वषार्पूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ‘ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे ‘फॉरबिडन राईस’ असे नाव ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्यामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले. भारतामध्ये उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे.असे आहेत फायदे

  •  यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आहे.
  •  या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त अ‍ॅन्टी आॅक्सिडेंट गुणधर्म आहेत.
  •  यात उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटिन आहे.

सेलूच्या बचत गटामार्फत उत्पादनकामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रीय शेतमाल उत्पादक स्वयंसहायता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात ‘ब्लॅक राईस’ची रोवणी केली होती. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत. आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेत काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांनी यावेळी दिली.

 

टॅग्स :Farmerशेतकरीfoodअन्न