शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजपचे सदस्य आपल्याच जाळ्यात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:16 IST

काळे दुपट्टे घालून प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न

नागपूर : राज्यातील सत्ता संघर्षात सत्ताधारी व विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. असेच चित्र जिल्हा परिषदेत निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेतकाँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यात मदतीला राष्ट्रवादी असल्याने विरोधकांची वेळोवेळी कोंडी होते. शुक्रवारी सर्वसाधारण सभेत याचा प्रत्यय आला.

हिंगणा तालुक्यात जिल्हा परिषदेतर्फे आयोजित मेळाव्याला आमदार समीर मेघे यांना निमंत्रण न दिल्याने भाजप व शिवसेनेचे सदस्य निषेध म्हणून सभागृहात काळे दुपट्टे घालून आले होते. प्रोटोकॉलवरून गोंधळ करण्याचा मनसुबा होता. मात्र, सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. प्रोटोकॉलची एकाच बाजूने अपेक्षा ठेवू नका, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात, आढावा बैठकांना आम्हाला तरी बोलावता का, असा सवाल करीत विरोधकांवर पलटवार केला.

विरोधी पक्षनेते आतिश उमरे व शिवसेना (शिंदे गट) संजय झाडे यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला. सीईओ सौम्या शर्मा यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजप सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. शर्मा यांनी अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्या निर्देशानुसार सदस्यांना निमंत्रित केल्याचे सांगितले. यावर समाधान न झाल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. यावर काँग्रेसचे तापेश्वर वैद्य यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आम्हालाही निमंत्रण नव्हते. येथे प्रोटोकॉल नाही का, असा सवाल केला. जिल्ह्यातील विकासकामे, जलजीवन मिशन आढावा बैठकांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांना निमंत्रण नसते. मग अध्यक्षांनी बैठक घेतली असेल तर तुम्ही अपेक्षा कशी करता, असा सवाल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला बोढारे यांनीही प्रोटोकॉलच्या बाता करू नका, माझ्या सर्कलमधील विकासकामांच्या भूमिपूजनाचे निमंत्रण नव्हते. तेव्हा प्रोटोकॉल नव्हता का, असा सवाल केला. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी प्रोटोकॉलच्या परिपत्रकाचे वाचन करण्यास सांगितले. यात जि.प.च्या आढावा बैठकांना आमदारांना बोलावण्याचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आणले.

अधिकाऱ्यांविरोधात सत्ताधारी-विरोधक एकत्र

अधिकारी सदस्यांना जुमानत नाही. त्यामुळे सभागृहाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना कसे धारेवर धरता येईल. याची ते संधी शोधत असतात. प्रोटोकॉलच्या मुद्यावरून विरोधकांनी सीईओ सौम्या शर्मा यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर जलजीवन मिशन संदर्भात केंद्र सरकारच्या विभागातर्फे आयोजित बैठकीला जाण्यासाठी शर्मा यांनी अध्यक्षांना परवानगी मागितली असता सभागृह महत्त्वाचे असल्याने त्यांना जाण्याला सत्ताधारी व विरोधकांनी विरोध दर्शविला. जात असाल तर अविश्वास आणू, अशी दोनदा भूमिका घेतली. तसेच कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी सभागृहाची माफी मागावी, यासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याचे चित्र शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दिसले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदBJPभाजपाnagpurनागपूरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस