शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बुलेट ट्रेनवर कोट्यवधीचा खर्च, शेतकऱ्यांना काहीच नाही; अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 10:38 IST

नागपुरात पोहचल्यानंतर दानवे पत्रकार परिषदेत बोलत होते.

नागपूर : संकटातील शेतकऱ्यांना मदतीची राज्य सरकारने फक्त घोषणा केली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या नशिबी तातडीची मदतही नाही. एकीकडे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना काहीच नाही, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सोमवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरून नागपुरात पोहचल्यानंतर दानवे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दानवे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेतात राहण्याच्या घोषणेचा समाचार घेत आधी शेतकऱ्यांना मदत गरजेची असल्याचे म्हटले. शिंदे गट-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना एक नव्हे, तीन-तीन वेळा अतिवृष्टीचा फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. मात्र सरकारचा फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे. कर्जमाफीच्या नावाखाली केवळ कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ३० हजार प्रकरणे आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दावे फेटाळले जात आहेत. अतिवृष्टीमुळे दगावलेल्या गुरांच्या मोबदल्यासाठी पोस्टमार्टेम रिपोर्ट मागितला जात आहे. वास्तविक सरकारनेच याची गरज नसल्याचे म्हटले आहे. यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, किशोर कन्हेरे, राजू हरणे, नितीन तिवारी आदी उपस्थित होते.

नागपूरचा अपेक्षित विकास नाही

नागपूरच्या विकासाबाबत मोठमोठे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात अपेक्षित विकास झाला नसल्याचे दानवे म्हणाले. स्वतंत्र विदर्भाबाबत विचारणा केली असता नागपूर वगळता विदर्भाचा विकास दूर आहे. नागपूरच्या मिहानमध्ये उद्योग आले नाहीत. मागील सरकारमधील उद्योग मंत्र्यांचा बचाव करीत दानवे यांनी स्थानिक नेत्यांचे यासाठी विशेष प्रयत्न नसल्याचे म्हटले.

टॅग्स :PoliticsराजकारणAmbadas Danweyअंबादास दानवेFarmerशेतकरीnagpurनागपूर