शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

बुलेट ट्रेनवर कोट्यवधीचा खर्च, शेतकऱ्यांना काहीच नाही; अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 10:38 IST

नागपुरात पोहचल्यानंतर दानवे पत्रकार परिषदेत बोलत होते.

नागपूर : संकटातील शेतकऱ्यांना मदतीची राज्य सरकारने फक्त घोषणा केली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या नशिबी तातडीची मदतही नाही. एकीकडे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना काहीच नाही, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सोमवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरून नागपुरात पोहचल्यानंतर दानवे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दानवे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेतात राहण्याच्या घोषणेचा समाचार घेत आधी शेतकऱ्यांना मदत गरजेची असल्याचे म्हटले. शिंदे गट-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना एक नव्हे, तीन-तीन वेळा अतिवृष्टीचा फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. मात्र सरकारचा फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे. कर्जमाफीच्या नावाखाली केवळ कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ३० हजार प्रकरणे आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दावे फेटाळले जात आहेत. अतिवृष्टीमुळे दगावलेल्या गुरांच्या मोबदल्यासाठी पोस्टमार्टेम रिपोर्ट मागितला जात आहे. वास्तविक सरकारनेच याची गरज नसल्याचे म्हटले आहे. यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, किशोर कन्हेरे, राजू हरणे, नितीन तिवारी आदी उपस्थित होते.

नागपूरचा अपेक्षित विकास नाही

नागपूरच्या विकासाबाबत मोठमोठे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात अपेक्षित विकास झाला नसल्याचे दानवे म्हणाले. स्वतंत्र विदर्भाबाबत विचारणा केली असता नागपूर वगळता विदर्भाचा विकास दूर आहे. नागपूरच्या मिहानमध्ये उद्योग आले नाहीत. मागील सरकारमधील उद्योग मंत्र्यांचा बचाव करीत दानवे यांनी स्थानिक नेत्यांचे यासाठी विशेष प्रयत्न नसल्याचे म्हटले.

टॅग्स :PoliticsराजकारणAmbadas Danweyअंबादास दानवेFarmerशेतकरीnagpurनागपूर