शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बुलेट ट्रेनवर कोट्यवधीचा खर्च, शेतकऱ्यांना काहीच नाही; अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 10:38 IST

नागपुरात पोहचल्यानंतर दानवे पत्रकार परिषदेत बोलत होते.

नागपूर : संकटातील शेतकऱ्यांना मदतीची राज्य सरकारने फक्त घोषणा केली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या नशिबी तातडीची मदतही नाही. एकीकडे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना काहीच नाही, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सोमवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरून नागपुरात पोहचल्यानंतर दानवे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दानवे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेतात राहण्याच्या घोषणेचा समाचार घेत आधी शेतकऱ्यांना मदत गरजेची असल्याचे म्हटले. शिंदे गट-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना एक नव्हे, तीन-तीन वेळा अतिवृष्टीचा फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. मात्र सरकारचा फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे. कर्जमाफीच्या नावाखाली केवळ कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ३० हजार प्रकरणे आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दावे फेटाळले जात आहेत. अतिवृष्टीमुळे दगावलेल्या गुरांच्या मोबदल्यासाठी पोस्टमार्टेम रिपोर्ट मागितला जात आहे. वास्तविक सरकारनेच याची गरज नसल्याचे म्हटले आहे. यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, किशोर कन्हेरे, राजू हरणे, नितीन तिवारी आदी उपस्थित होते.

नागपूरचा अपेक्षित विकास नाही

नागपूरच्या विकासाबाबत मोठमोठे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात अपेक्षित विकास झाला नसल्याचे दानवे म्हणाले. स्वतंत्र विदर्भाबाबत विचारणा केली असता नागपूर वगळता विदर्भाचा विकास दूर आहे. नागपूरच्या मिहानमध्ये उद्योग आले नाहीत. मागील सरकारमधील उद्योग मंत्र्यांचा बचाव करीत दानवे यांनी स्थानिक नेत्यांचे यासाठी विशेष प्रयत्न नसल्याचे म्हटले.

टॅग्स :PoliticsराजकारणAmbadas Danweyअंबादास दानवेFarmerशेतकरीnagpurनागपूर