शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 10:47 IST

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात, की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरित आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांत सरकार्यवाहांची निवडराजकीय वर्तुळाचेदेखील लागले लक्ष

योगेश पांडे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन सरकार्यवाहांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात, की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरित आहे. देशातील सध्याची स्थिती लक्षात घेता या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नागपूरबाहेर प्रथमच सरकार्यवाहांची निवड होणार आहे.

संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. परंतु यात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या सभेत सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. सरकार्यवाहांची निवड झाल्यानंतरच संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येते. सरकार्यवाहांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे होते. या पदासाठी आतापर्यंत एकदाही मतदान करण्याची वेळ आलेली नाही. निवड करून सरकार्यवाहांच्या नावाची घोषणा करण्यात येते. १९ व २० मार्चच्या सभेतदेखील असेच व्हावे, असा संघाचा प्रयत्न आहे.

 

२०१२, २०१५ व २०१८ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. जोशी यांचे प्रशासनकौशल्य पाहता त्यांचीच फेरनिवड व्हावी यासाठी संघातील बरेच धुरीण आग्रही आहे. परंतु गेल्या तीन वर्षांतील संघाने घेतलेली भूमिका आणि संघप्रणीत संघटनांचे वाढते प्राबल्य यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येण्याची शक्यता आहे. तुलनेने तरुण असलेले सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, डॉ. कृष्णगोपाल यांच्यासह इतर सहसरकार्यवाहांच्या नावाचादेखील विचार होण्याची प्रबळ शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

सरकार्यवाहच मुख्य प्रशासक

संघाच्या संविधानानुसार संघाचे सर्वोच्च अधिकारी हे सरसंघचालक नाहीत, तर सरकार्यवाह हे आहेत. सरसंघचालक हे संघाचे मार्गदर्शक असतात, तर सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात. संघाचा विस्तार, संघाची विविध कार्य इत्यादींवर सरकार्यवाह यांचे थेट लक्ष असते.

असा राहिला सरकार्यवाहपदाचा इतिहास

१९२९- आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी बालाजी हुद्दार यांची सरकार्यवाह म्हणून नियुक्ती केली

१९५० - संघाच्या पहिल्या अ.भा. प्रतिनिधी सभेत प्रभाकर बळवंत उपाख्य भय्याजी दाणी यांची सरकार्यवाह म्हणून निवड

१९५६ - एकनाथ रानडे यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी

१९६२ - प्रभाकर बळवंत उपाख्य भय्याजी दाणी यांची सरकार्यवाह म्हणून निवड

१९६५ -बाळासाहेब देवरस यांची सरकार्यवाह म्हणून निवड

१९७३ - माधवराव मुळे यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी

१९७९ - रज्जूभय्या यांची सरकार्यवाहपदी निवड

१९८७ - हो.वे.शेषाद्री हे संघाचे सरकार्यवाह झाले

२००० -डॉ.मोहन भागवत यांची सरकार्यवाहपदी निवड

२००९ - सुरेश उपाख्य भय्याजी जोशींची सरकार्यवाहपदी निवड

२०१८ - सलग चौथ्यांदा सरकार्यवाहपदी सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांची निवड

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ