शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रिकामटेकड्यांनो सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे सर्वत्र धास्ती निर्माण झाली असल्याने दंडा चालवून कडक धोरण राबविण्याऐवजी आवाहन करण्यावर भर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे सर्वत्र धास्ती निर्माण झाली असल्याने दंडा चालवून कडक धोरण राबविण्याऐवजी आवाहन करण्यावर भर देण्याचा प्रकार रिकामटेकड्यांच्या लक्षात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. शहरातील विविध भागांत चाैकाचाैकात तात्पुरते तंबू उभे केले असून गुरुवारी सर्वत्र व्हेईकल रूट मार्च करून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

कोरोनाचा झपाट्याने होत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेत सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. सर्वच जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवून आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा, गर्दी करू नका, असे पोलीस वारंवार आवाहन करीत आहेत. मात्र, बेशिस्त मंडळी त्याला दाद द्यायला तयार नाही. कोरोनाबाधितांची भयावह आकडेवारीही लक्षात घ्यायला तयार नाही. जागोजागी गर्दी केली जात आहे. ते लक्षात घेऊन पोलिसांनी आता कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, विविध चौकांत पोलिसांचे तात्पुरते तंबू उभारले असून शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. आता रिकामटेकडे फिरताना दिसले की त्यांचा योग्य प्रकारे पोलीस बंदोबस्त करणार आहेत. त्यासाठी तीन हजार पोलिसांनी मदतीला एसआरपीएफच्या दोन कंपन्या आणि होमगार्ड घेतले आहे. शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथकही सज्ज करण्यात आले आहे.

----

१७६ जणांवर कारवाई

पोलिसांनी आज विना मास्क फिरणाऱ्या ६७, गर्दी करणाऱ्या ५२ आणि विनाकारण फिरणाऱ्या ५७ वाहनचालक अशा एकूण १७६ जणांवर कारवाई केली.

----