शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक; दरवर्षी पाच हजारांवर लोकांची जाते दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 18:10 IST

Nagpur : दुखापतींमध्ये १६ वर्षांखालील ४९ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिवाळी म्हणजे अमावस्येच्या काळोखाला भेदणारा प्रकाशाचा सण. रोशणाईचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. पण कधी कधी अति उत्साहात सुरक्षेकडे जरा दुर्लक्ष होते. विशेषतः फटाक्यांमुळे अंधत्वाची जोखीम निर्माण होते. देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. अनार, सुतळी बॉम्ब, चक्री आणि रॉकेट या फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

फटाक्यांमुळे होणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाखांवर आहे. फटाक्यात चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात. या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना, तसेच त्वचेला अपायकारक असतो. दमा व अॅलर्जीचे प्रमाण वाढते. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डिग्रीपर्यंत वाढते. यामुळे फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते 

फटाक्यांच्या धोक्यापासून १६ वर्षांखालील मुलांना जपाबंगरुळू येथील शासकीय मिंटो ऑप्थल्मोलॉजी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नोंदीनुसार, २००८ ते २०२० या कालावधीत फटाक्यांमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापतींवरील आणि रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती सादर केली आहे. यात फटाक्यांमुळे झालेल्या डोळ्यांच्या दुखापतींपैकी १६ वर्षांखालील मुलांचा वाटा ४९.३ टक्के आहे. यामुळे फटाक्यांपासून १६ वर्षांखालील मुलांना जपा, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांनी केले आहे.

बघणाऱ्यांना जास्त इजासारक्षी नेत्रालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रिकल फुसाटे, नेत्ररोग तज्ज्ञ फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना याची जास्त इजा होते. कारण, स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यात जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा गमवावा लागू शकतो. बारूदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते.

जखम झाल्यास नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या "फटाक्यामुळे डोळ्याला इजा झाल्यास तातडीने नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टरांपर्यंत पोहचेपर्यंत डोळे चोळू नका. यामुळे डोळ्यातील द्रव्य बाहेर येऊ शकते किंवा डोळ्यात फसलेले कण आत खोलवर जाऊ शकतात. डोळा खराब होण्याची शक्यता असते. स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत. शक्य तितक्या लवकर जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवून उपचार करावा." - डॉ. प्रशांत बावनकुळे, नेत्ररोग तज्ज्ञ. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024nagpurनागपूर