शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

२०१९ ची लढाई पुन्हा मुद्यांवर होणार : रामदेवबाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 5:44 PM

आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक ही पुन्हा एकदा मुद्यांवर आधारित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले आहे की, ते त्यांनी केलेल्या कामांचा हिशोब सादर करतील. तर विरोधकही आपले मुद्दे लावून धरतील. आता देशाचे हृदय कोण जिंकेल हे येणारी वेळच ठरवेल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे सांगितले. रामदेवबाबा हे शनिवारी काही कामानिमित्त शहरात आले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

ठळक मुद्देदेशाचे हृदय कोण जिंकेल हे वेळ ठरवेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक ही पुन्हा एकदा मुद्यांवर आधारित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले आहे की, ते त्यांनी केलेल्या कामांचा हिशोब सादर करतील. तर विरोधकही आपले मुद्दे लावून धरतील. आता देशाचे हृदय कोण जिंकेल हे येणारी वेळच ठरवेल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे सांगितले.रामदेवबाबा हे शनिवारी काही कामानिमित्त शहरात आले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.काळा पैसा, भ्रष्टाचार आणि व्यवस्था परिवर्तन हे तीन मुद्दे महत्त्वाचे होते. काळा पैसा देशातील व्यवस्थेत किंवा विदेशातील बँकेत असो. त्यासाठी सरकारने काही कामे निश्चित केली. विदेशातील बँकेत काळा पैसा आहे, तो अजूनही मोठा प्रश्न आहे. भ्रष्टाचार अजूनही देशावरील जखम आहे. यासाठी खालून वरपर्यंत काम करण्याची गरज आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी खूप मोठे काम करण्याची गरज आहे. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीऐवजी या देशातील शिक्षण पद्धत आणून पुन्हा या देशाला वैभव प्राप्त करावे.पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने रोजगाराचे आकडे सादर केले, त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता रामदेवबाबा म्हणाले, राजकारणात आकड्यांचाही वेगळाच प्रकारचा खेळ असतो. त्यात मला पडायचे नाही. परंतु इतके निश्चित सर्वांनाच या दिशेने एक प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. कारण देशात बेरोजगारी, गरिबी, भूक, असमानता मोठे मुद्दे आहेत. सामाजिक न्याय, आर्थिक न्यायासाठी व रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी सर्वांनाच प्रयत्न करायला हवे, आम्हीही करीत आहोत. आम्ही एका महिन्यात ११ हजार लोकांना नोकरी दिली. अजून दोन-तीन महिन्यात देणार असून डिसेंबरपर्यंत २० हजार लोकांना नोकरी देणार. येणाºया दिवसात पाच लाख लोकांना रोजगार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे काम आम्ही देशसेवेचे व्रत म्हणून करतोय, असेही रामदेवबाबा यांनी सांगितले.मतभेद असावे मनभेद असू नयेविश्वासमतावरील भाषणानंतर राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांची गळा भेट घेतली, त्यावरून देशात गदरोळ माजला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता रामदेवबाबा म्हणाले, सरकारकडे विश्वासमतापेक्षा अधिक नंबर अगोदरच होते. त्यामुळे जिंकणे निश्चित होतेच. मात्र सत्तापक्ष व विरोधी पक्षात या माध्यमातून मुद्यांवर आधारित चर्चा घडून आली. ती लोकशाही परंपरेसाठी चांगले आहे. राजकीय पक्षांमध्ये मुद्यांवर आधारित, विचार, धोरणे, सिद्धांतांवर आधारित विरोध व समर्थन असणे आवश्यक आहे. पण मनात वैमनस्य असू नये. मतभेद असावे पण मनभेद असून नये. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. राहुल गांधी यांनी सभागृहात डोळा मारण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाPoliticsराजकारण