शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

खासगी शिकवणी वर्गांवर बंदी घालावी

By admin | Updated: July 31, 2016 02:35 IST

आज शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. संस्थाचालक शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी थाटून बसले आहेत.

मुक्तचर्चा : शिक्षक संघटना, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांची मागणी नागपूर : आज शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. संस्थाचालक शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी थाटून बसले आहेत. त्याचवेळी खासगी शिकवणी वर्गाच्या स्वरूपातील रोगाने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला गिळंकृत केले आहे. त्यामुळे संस्थाचालकांची ही दुकानदारी बंद करण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करून खासगी शिकवणी वर्गांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व विद्यार्थ्यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्यावतीने ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेतील अपप्रवृत्तीला जबाबदार कोण?’ या विषयावर शनिवारी ‘मुक्तचर्चा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा सूर पुढे आला. शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुलाच्या कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘नुटा’ या शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल ढगे होते. तर या चर्चेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस डॉ. प्रमोद मुनघाटे, प्राचार्य रेखा दंडिगे-घिया, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या शहर अध्यक्ष पूजा चौधरी, रंजना कावडे, विजय खडसे, दीपेंद्र बेंद्रे, रमेश बिरेकर, राजेंद्र गंगोत्री, ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत उपाध्यक्ष कल्पना तिवारी व अनंत तुमडे यांनी भाग घेतला होता. यावेळी नामदेव सास्ते यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक कडू अनुभव कथन केले. दरम्यान ते म्हणाले, आज कॉन्व्हेटच्या माध्यमातून आपणच आपल्या मुलांना कुठे नेतो आहे, याचा विचार झाला पाहिजे. विदर्भ हा शिक्षणात दिवसेंदिवस मागे पडत आहे. शिवाय त्यामधील नागपूर हे शिक्षणाच्या बाजारीकरणाचे केंद्र झाले आहे. शिक्षण क्षेत्रात सर्रास दुकानदारी सुरू झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते सरकार मात्र गप्प आहे. खासगी शिकवणी वर्गामुळे विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयांत येणे सुद्धा बंद केले आहे. मोठमोठ्या शाळांनी आणि या खासगी शिकवणी वर्गांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण सुरू केले आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थीच जात नसताना त्या सर्व शाळा नियमित चालत असून, शिक्षकांना सुद्धा गलेलठ्ठ पगार मिळत आहे. त्यामुळे सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी ‘बायोमेट्रिक सिस्टीम’ लावून, ज्या शाळेत विद्यार्थीच येत नसेल, तेथील शिक्षकांना पगारच दिला जाऊ नये. असेही परखड मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य रेखा दंडिगे-घिया यांनी केले.(प्रतिनिधी) पालकांनी आवाज उठवावा अलीकडे प्रत्येक शाळा-महाविद्यालय शालेय साहित्य विक्रीचे दुकान थाटून बसले आहेत. या माध्यमातून विद्यार्थी व पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. विद्यार्थ्यांना शाळेतूनच शालेय साहित्य खरेदीचे बंधन घातले जात आहे. हे चूक असले तरी याविरुद्ध तक्रार करण्यास कुणीही पुढे येत नाही. मात्र पालकांनी याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन यावेळी ग्राहक पंचायतीच्या विदर्भ प्रांत उपाध्यक्ष कल्पना तिवारी यांनी केले. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांच्या नियुक्त्यांमधून प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा सुद्धा घालावत आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ संस्थाचालकांकडून शिक्षकांच्या नियुक्त्यांचे अधिकार काढून, सर्व शिक्षकांच्या नियुक्त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून (सीईटी) करण्यात याव्या, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नागपूर विभाग प्रमुख पूजा चौधरी यांनी केली.