शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महाराष्ट्राच्या सूपुत्राने राबविले 'ऑपरेशन बालासोर', वाचविले शेकडो जणांचे प्राण

By नरेश डोंगरे | Updated: June 9, 2023 06:15 IST

शिंदे यांची अतुल्य कामगिरी, सहा दिवसांपासून आहे सलग सक्रिय

नरेश डोंगरे

नागपूर : २ जून सायंकाळी साधारणत: ७ ची वेळ असावी. मला मिळालेला पहिला निरोप ट्रेन पटरीवरून उतरली असावी, अशा आशयाचा होता. मात्र, घटनास्थळी पोहचलो तेव्हा काही क्षण सुन्नच झालो. कल्पनेच्या पलिकडचा अपघात होता. घुप्प अंधाराला किंकाळ्या चिरून जात होत्या. जस जसे समोर जात होतो तस तसे जखमी अन् वेदनांनी विव्हळणारे दिसत होते. फारच विदारक होते. वेळ यंत्रासारखीच जलदगतीने निर्णय घ्यायची होती, हे उद्गार आहेत महाराष्ट्राच्या त्या सूपुत्राचे ज्याने देश-विदेशात चर्चेला आलेल्या बालासोर (ओडिशा) येथील रेल्वेच्या भीषण अपघातानंतरची संपूर्ण परिस्थिती हाताळली. शेकडो जखमींना तातडीने मदत उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचविले... नाव आहे, दत्तात्रेय भाऊसाहेब शिंदे !

वडगाव, सावताळ (ता. पारनेर) येथील मुळ निवासी असलेले दत्तात्रेय उर्फ दत्ता शिंदे बालासोरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २ जूनच्या रात्री बालासोरमध्ये भीषण अपघात झाला अन् त्यात तीनशेच्या आसपास व्यक्तींचे जीव गेले. शेकडो जणांना गंभीर दुखापत झाली. अपघातस्थळी पोहचलेल्या शिंदे यांनी त्या क्षणापासून यंत्रासारखे जलदगतीने निर्णय घेतले, तसेच मदतकार्यही राबविले. 'लोकमत' प्रतिनिधीने आज त्यांच्याशी संपर्क साधून 'ऑपरेशन बालासोर' जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अत्याधिक व्यस्त असूनही सहकाऱ्यांना आवश्यक निर्देश देतादेताच त्यांनी लोकमतला माहितीही दिली. ते म्हणाले, तेथे त्यावेळी खूप अंधार होता. त्यामुळे सर्वप्रथम मोबाईलचे टार्च, सोबतच्या वाहनांच्या लाईटसने प्रकाश करून जखमींना हलविणे सुरू केले. हे करतानाच ५० वर लाईट टॉवर लावून जनरेटरच्या मदतीने प्रकाश व्यवस्था केली. जखमींना वाचविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. सुमारे एक हजार ते बाराशे व्यक्तींना आजुबाजुच्या शहरातील विविध ईस्पितळात पाठविले ठिकठिकाणच्या एम्बुलन्स बोलवून काही जखमींवर जागीच उपचार करून घेतले.

घटनास्थळी मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांना माहिती देताना

आम्ही अडीच हजार अन् शेकडो देवदूत

लोकमतशी बोलताना शिंदे यांनी देवदुतांची गोष्ट सांगितली. गेल्या सहा दिवसांपासून आम्ही सुमारे अडीच हजार अधिकारी-कर्मचारी काम करतो. मात्र, अपघात झाल्यापासूनच शेकडो देवदूत येथे अपघातग्रस्तांंच्या मदतीसाठी तहानभूक विसरून मदतकार्य करीत आहेत. एक आवाहन केले आणि शेकडो नागरिक रक्तदानासाठी हजर झाले. शेकडो हात जखमींना एम्बुलन्समध्ये आणि मृतदेह रुग्णालयात पोहचविण्यास सरसावले. भूक तहान विसरून, कोणतीही अपेक्षा न करता स्वयंस्फुर्तीने या देवदुतांनी मदत कार्यात दिलेले योगदान अतुलनिय असल्याचेही ते म्हणाले.

घटनास्थळी मदतकार्य मार्गदर्शन करताना

आता 'त्यांना' सर्वोच्च प्राधान्य

आता कशाला प्राधान्य देताहात, असे विचारले असता शिंदे म्हणाले, जखमींवर तातडीचे उपचार ही आतापर्यंतची प्रायोरिटी होती. आता मात्र अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना घरपोच डेथ सर्टिफिकेट आणि सरकारी मदत देण्याला प्राधान्य देत आहोत. प्रमाणपत्राशिवाय विम्याची रक्कम आणि अन्य सुविधा मिळत नाही. त्यामुळे वेेगवेगळ्या पथकांना डेथ सर्टीफिकेट आणि सरकारी मदत मिळवून देण्यासाठी नियुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकOdisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातcollectorजिल्हाधिकारी