शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या पुनर्बांधणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा

By admin | Updated: April 13, 2016 03:10 IST

स्वातंत्र्यानंतर जे जे प्रश्न देशापुढे निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केले आहे.

सुखदेव थोरात : वीज वितरण कंपनीतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्याननागपूर : स्वातंत्र्यानंतर जे जे प्रश्न देशापुढे निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केले आहे. देशाचे राजकीय स्वातंत्र्य, देशाची राज्यघटना, आर्थिक धोरणे, सामाजिक बांधणी अशा समस्त बाबींवर त्यांनी विचार मांडले आणि या बाबींशी निगडित समस्यांवर उपायही सुचविले. त्यांच्या सूचना त्यावेळी स्वीकाराव्या लागल्या व आजही त्याच विचारांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे अखंड भारताच्या पुनर्बांधणीत डॉ. आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन भारतीय समाज विज्ञान व संशोधन परिषदेचे अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी केले.महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व डॉ. आंबेडकर जयंती संयुक्त उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. थोरात बोलत होते. डॉ. थोरात यांनी १९२० पासून १९५६ पर्यंतच्या देशातील राजकीय घडमोडींचा लेखाजोखाच यावेळी मांडला. धर्मनिरपेक्ष राष्ट्र, समान न्याय, समान संधी, जातीविरहित समाज या बाबींसह देशाचा आर्थिक व राजकीय विकास या सर्व गोष्टी देशाला स्वीकाराव्या लागल्या. मजूर मंत्री असताना स्त्रियांना समान अधिकार, गरोदर महिलांना रजा, कामगारांसाठी सवलती, रविवारची सुटी अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. शिवाय गोदावरी व्हॅली, हिराकुंड धरण, भाकरानांगल धरण, सोन धरण उभारण्यात डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कृती मोलाची ठरली आहे. सेंटर वॉटर कमिशन व सेंटर पॉवर कमिशन त्यांनीच स्थापन केले आहे. त्यांच्यामुळेच देशाला जलसंपदा व ऊर्जा मंत्रालय स्थापन करावे लागले. आजची आर्थिक धोरणे त्यांच्या विचारातून तयार झाली आहेत. विकासासाठी लहान राज्यांची संकल्पना त्यांनीच देशाला दिली आहे. हे सर्व केवळ दलितांसाठी नाही तर राष्ट्रासाठी आहे. स्वातंत्र्यापूर्वी व नंतर देशातील असा कोणताच मुद्दा नाही ज्यावर डॉ. बाबासाहेबांनी विचार मांडले नाही. त्यामुळेच आज राजकारण्यांना कोणत्याही मुद्यावर त्यांच्याच विचारांचा व तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. दुर्दैवाने त्यांचे योगदान जाणूनबुजून झाकले गेल्याची टीका डॉ. थोरात यांनी केली. या कार्यक्रमाला भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, कामगार नेते जे.एस. पाटील प्रमुख वक्ते तर मंचावर वीज कंपनीचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, यु.बी. शहारे, सम्राट वाघमारे, राकेश जनबंधू, प्रकाश पवार, महेंद्र ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश पवार व संचालन नाईक यांनी केले.(प्रतिनिधी)