शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

संतसाहित्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी; नितीन गडकरी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 4:54 PM

संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी. सरकार सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देयाच महिन्यात होणार वारकरी पालखी मार्गाचे भूमीपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतिहास, संस्कृती आणि वारसा ही आपली ताकद आहे. यात महाराष्ट्रातल्या संतांचे मोठ्ठे योगदान असून, ही ताकद पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि भविष्य संस्कारित व्हावी असे वाटत असेल तर, संत साहित्याचे डिजिटलाईजेशन होणे ही काळाची गरज आहे. संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी आणि त्यासाठी आचार्य म. रा. जोशी यांनी पुढाकार घ्यावा.. सरकार त्यांना सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य डॉ. म. रा. जोशी यांना गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी, ते बोलत होते. रविवारी सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर सचिव शैलेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रभारी संचालक मीनल जोगळेकर, डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे उपस्थित होते.संत साहित्य समाजाला दिशा देणारे आणि मनावर संस्कार करणारे आहे. या साहित्यांतून महाराष्ट्राची सुसंस्कृत पिढी निर्माण झाली आहे. अशा साहित्याचे संशोधन करणाऱ्या डॉ. म.रा. जोशी यांची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली, हे कौतुकास्पद आहे. जोशी यांचा हा सन्मान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा गौरव ठरला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि अन्य संतांच्या साहित्यातील चिंतन हे जगतानाला मार्गदर्शक ठरणारे असून, त्यांचे विचार जगाच्या कानाकोपºयात पोहोचवायचे असतील तर त्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. दरवर्षी पंढरपूरला निघणाºया वारीतून अध्यात्मीत वातावरणाचे उत्सर्जन होत असते. या वारीसाठी आठ हजार कोटी रुपये खर्चुन देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर वारकरी पालखी मार्ग बांधण्यात येत आहे. त्याचे भूमीपुजन याच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या उपस्थिती पार पडणार असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. संचालन रेणूका देशकर यांनी केले. तर आभार श्रीराम पांडे यांनी मानले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी