शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी अरविंद सिंगने थांबविला खटला

By admin | Updated: February 10, 2015 00:51 IST

योग्य न्यायासाठी आपणाविरुद्धचा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित केला जावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता सोमवारी खुद्द आरोपी अरविंद सिंग याने युग चांडक

नागपूर : योग्य न्यायासाठी आपणाविरुद्धचा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित केला जावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता सोमवारी खुद्द आरोपी अरविंद सिंग याने युग चांडक अपहरण खून खटल्याची सुनावणी थांबवली. जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू असून, न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब केली.‘चप्पल’वरून गोंधळआरोपी अरविंद सिंग याच्या कबुलीजबाबातील एक पंच साक्षीदार हर्ष प्रकाशचंद्र फिरोदिया याची सरतपासणी सरकारी वकील ज्योती वजानी यांनी घेतली. या साक्षीदाराने असे सांगितले की, अरविंद सिंग याने लकडगंज पोलीस ठाण्यात आपल्या व अन्य दुसऱ्या पंचासमोर कबुलीजबाब दिला होता. माझ्या घरी चला , मी गुन्ह्यात वापरलेले कपडे व साहित्य काढून देतो, असे तो म्हणाला होता. ९ सप्टेंबर २०१४ रोजी त्याने हा कबुलीजबाब दिला होता. त्यानंतर पोलीस आणि आम्ही दोन पंच अरविंद सिंगसोबत त्याच्या जरीपटका कपिलनगर येथील घरी गेलो. घरातून त्याने लाल रंगाचा युगचा टी-शर्ट, युगच्या कानातील बाळी आणि स्वत:चे कपडे काढून दिले होते, असेही या साक्षीदाराने सांगितले. या साक्षीदाराची उलटतपासणी आरोपी राजेश दवारे याचे वकील अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांनी घेण्यास नकार दिला. दुसरा आरोपी अरविंद सिंग याचे वकील अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय यांनी या साक्षीदाराची उलटतपासणी सुरू केली. उपाध्याय यांनी या साक्षीदारास कबुलीजबाबाच्या वेळी आरोपीने कोणते कपडे घातले होते, असा प्रश्न करताच साक्षीदाराने पांढऱ्या रंगाच्या कपड्याचा उल्लेख केला. आरोपीने कोणती चप्पल घातली होती, असा प्रश्न करताच न्यायालयाने हस्तक्षेप करीत अ‍ॅड. उपाध्याय यांना थांबवले. या प्रश्नाचा या खटल्याशी संबंध नाही, म्हणून आपण या प्रश्नाची आणि उत्तराचीही नोंद करणार नाही, असे स्पष्ट केले. यावर अ‍ॅड. उपाध्याय आणि न्यायाधीशात शाब्दिक चकमक उडाली. लागलीच उपाध्याय यांनी आरोपी अरविंद सिंग याच्यावतीने न्यायालयात खटला तहकुबीचा अर्ज दाखल केला. महत्त्वाच्या साक्षीदाराला वस्तुस्थितीवर आधारित उलटतपासणीत आपल्या वकिलास प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीबाबतचा प्रश्न विचारण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे योग्य न्यायासाठी हा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित व्हावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता हा खटला तहकूब करावा, असा उल्लेख अर्जात करण्यात आला. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीसाठी प्रश्न विचारण्याचे प्रावधान कोणत्याही कायद्यात नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट करून खटल्याची सुनावणी २३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. न्यायालयात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा उपस्थित होते. (प्रतिनिधी)