शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रास्त्र करारात गोपनीयता असणे साहजिकच : व्ही.के.अत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 23:27 IST

‘राफेल’ विमान ही अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहेत. मात्र त्याच्या करारावरून सुरू असलेला वाद अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. जगात शस्त्रास्त्रांच्या करारात किमतीबाबत नेहमीच गोपनीयता पाळण्यात येते व व्यावहारिकदृष्ट्या ते बरोबरदेखील आहे. ‘राफेल’चा वाद हा राजकीय स्वरुपाचा असून २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यासंदर्भात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत, असे मत ‘डीआरडीओ’चे (डिफेन्स रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन) माजी महासंचालक वासुदेव अत्रे यांनी व्यक्त केले. संरक्षण क्षेत्रातील योगदानाबाबत अभियंता दिनानिमित्त ‘इंजिनिअर्स फोरम’तर्फे त्यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. यासाठी नागपुरात आले असताना ते बोलत होते.

ठळक मुद्दे ‘इंजिनिअर्स फोरम’तर्फे अभियंता दिनानिमित्त सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘राफेल’ विमान ही अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहेत. मात्र त्याच्या करारावरून सुरू असलेला वाद अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. जगात शस्त्रास्त्रांच्या करारात किमतीबाबत नेहमीच गोपनीयता पाळण्यात येते व व्यावहारिकदृष्ट्या ते बरोबरदेखील आहे. ‘राफेल’चा वाद हा राजकीय स्वरुपाचा असून २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यासंदर्भात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत, असे मत ‘डीआरडीओ’चे (डिफेन्स रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन) माजी महासंचालक वासुदेव अत्रे यांनी व्यक्त केले. संरक्षण क्षेत्रातील योगदानाबाबत अभियंता दिनानिमित्त ‘इंजिनिअर्स फोरम’तर्फे त्यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. यासाठी नागपुरात आले असताना ते बोलत होते.कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ.प्रमोद पडोळे, ‘इंजिनिअर्स फोरम’चे अध्यक्ष प्रकाश कुळकर्णी, कार्याध्यक्ष सुरेश गाधेवार, सचिव केशव तायडे, कोषाध्यक्ष यादव लक्षणे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी व्ही.के.अत्रे यांनी ‘तंत्रज्ञान व युद्धभूमी’ या विषयावर मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी संरक्षण संशोधन क्षेत्र व तांत्रिक स्थितीबाबत आपले मत मांडले. कुठलाही देश हा तंत्रज्ञानात सर्वोत्तम असेल तरच महासत्ता होऊ शकतो. मात्र आजपर्यंत संशोधनाला कुठल्याच सरकारने हवे तसे महत्व दिलेले नाही. संशोधकांप्रति सरकारचा दृष्टिकोन दुर्दैवीच राहिला आहे. जोपर्यंत संशोधकांना संशोधनासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही तोपर्यंत देश तांत्रिकदृष्ट्या समर्थ होऊ शकणार नाही. संरक्षण क्षेत्रातील संशोधनासाठी ‘जीडीपी’च्या तुलनेत कमी तरतूद होती. देशाचा 'जीडीपी' लक्षात घेता केंद्र शासनाने संरक्षण क्षेत्रात केलेली तरतूद कितपत पुरेशी आहे यावर मंथन झाले पाहिजे. शिवाय जास्त तरतूद केली तर तिचा योग्य उपयोग करण्याची क्षमता आपल्या देशात आहे का याचादेखील विचार व्हायला हवा, असे व्ही.के.अत्रे म्हणाले. आपल्या देशातील विद्यार्थी व तरुणांकडे प्रचंड ‘टॅलेन्ट’ आहे. मात्र त्यांना योग्य मंच उपलब्ध करुन दिला पाहिजे. शालेय जीवनापासूनच त्यांच्यात संशोधनाचे बीज रोवण्याची आवश्यकता आहे, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमादरम्यान ‘इंजिनिअर्स फोरम’च्या स्मरणिकेचेदेखील प्रकाशन करण्यात आले.संशोधकांना पुरेसा वेळ द्याअमेरिका किंवा इतर प्रगत देशांमध्ये संशोधनावर प्रचंड निधी खर्च करण्यात येतो व संशोधकांना काम करण्यासाठी हवा तेवढा वेळ देण्यात येतो. आपल्या देशाची तांत्रिक प्रगती करायची असेल तर सर्वात अगोदर संशोधकांना संशोधनासाठी आवश्यक वेळ द्यायला हवा. अनेकदा संशोधनाचे अपेक्षित निकाल हे १० ते १५ वर्षे येत नाही. सरकारने तेवढा संयम बाळगला पाहिजे, असेदेखील ते म्हणाले.युद्धासाठी नेहमी तयारी हवीयुद्ध ही एक अशी बाब आहे जी कधीही होऊ शकते व त्याला थांबविले जाऊ शकत नाही. युद्धासाठी नेहमी तयारीदेखील आवश्यक असते. जर तुम्हाला युद्धात इतर राष्ट्रांवर वर्चस्व ठेवायचे आहे तर तांत्रिकदृष्ट्या संरक्षण क्षेत्राला ‘अपडेट’ राहावेच लागेल. यात देशातील अभियंत्यांची मौलिक भूमिका असून त्यांना नवीन संशोधनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलnagpurनागपूर