शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

नागपुरात कृषी विद्यापीठाच्या परिसरात शेतकऱ्यांनी पेटविले धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 9:48 PM

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे धरणातील पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातूनही कसेबसे शेतकऱ्यांच्या हातात पीक आले असताना शासनाने धानाचे भाव पाडल्याने शेतकरी पुरता खचलेला आहे. आपल्या व्यथा शासनापुढे मांडण्यासाठी रामटेक व पारशिवनी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळले. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतात धान जाळले.

ठळक मुद्देपडलेल्या भावामुळे शेतकरी चिंतेत : खर्चही निघाला नसल्याची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे धरणातील पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातूनही कसेबसे शेतकऱ्यांच्या हातात पीक आले असताना शासनाने धानाचे भाव पाडल्याने शेतकरी पुरता खचलेला आहे. आपल्या व्यथा शासनापुढे मांडण्यासाठी रामटेक व पारशिवनी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळले. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतात धान जाळले.सहा वर्षाआधी ३८०० रुपये विकलेल्या धानाला आज ३००० ते ३२०० भावाने शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे लागलेली लागत सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे हतबल आणि संतप्त झालेल्या टेकाडी येथील भगवानदास यादव या शेतकऱ्याने आपल्या शेतात धान पिक पेटवून सरकारचा विरोधात संताप नोंदविला आहे. सरकारने शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन दिले आणि सत्ता मिळवली. आता मात्र सर्व काही फोल ठरत आहे. शेतकरी नेते संजय सत्यकार यांनी जिल्ह्यातील धानपट्ट्यात सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. सरकारला शेतकऱ्यांची थोडी तरी फिकर असेल तर लवकरत लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई जाहीर करावी व धानाच्या पडलेल्या भावाबद्दल भूमिका ठरवावी, अन्यथा आता शेतकरी शांत बसणार नाही आता थेट मुख्यमंत्राच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपुरात पोहचून गुरुवारी काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन