शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मनपा-ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे आवाहन; चला करूया विजेची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 10:56 AM

आपली घरे, प्रतिष्ठानांमध्ये सुरू असलेले अनावश्यक वीज दिवे दररोज किमान एक तासासाठी बंद ठेवा, असे आवाहन महापालिका कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी केले.

ठळक मुद्देरात्री ८ ते ९ या वेळेत अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन

ऑनलाईन लोकमतनागपूर : आज बचत केली नाही तर भविष्यात वीज संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे वेळीच सावध व्हा, पाणी आणि विजेचे महत्त्व ओळखा. या दोन्ही वस्तूंची बचत करा. इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा. आपली घरे, प्रतिष्ठानांमध्ये सुरू असलेले अनावश्यक वीज दिवे दररोज किमान एक तासासाठी बंद ठेवा, असे आवाहन महापालिका कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी केले.पौर्णिमा दिनानिमित्त धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या आग्याराम देवी चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. महापालिका व आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्यावतीने प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तत्कालीन महापौर तथा आमदार प्रा. अनिल सोले यांनी पौर्णिमा दिवसाची संकल्पना मांडली.शुक्रवारी आग्याराम देवी मंदिर चौकात महापौर नंदा जिचकार, मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनात पौर्णिमा दिन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी महापौर व भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यावेळी उपस्थित होते.मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात कनिष्ठ अभियंता दिलीप वंजारी, सुनील नवघरे यांच्या उपस्थितीत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, कार्तिकी कावळे, प्रिया यादव, शांतनु शेळके, आयुष शेळके या स्वयंसेवकांनी वीज बचतीचे महत्त्व पटवून सांगितले आणि अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी याला प्रतिसाद दिला.

टॅग्स :electricityवीज