शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 3:04 PM

गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास राज्यामध्ये भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देभ्रष्टाचार प्रतिबंध कायदा नागरिकांसाठी प्रभावी शस्त्र

राकेश घानोडे

नागपूर : राज्यातील नागरिकांसाठी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा प्रभावी शस्त्र ठरत आहे. पीडितांनी या कायद्याच्या आधारे आतापर्यंत असंख्य भ्रष्ट लोकसेवकांना धडा शिकविला आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास राज्यामध्ये भ्रष्ट लोकसेवकांविरुद्ध दरवर्षी सरासरी ८३८ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

कायदे व नियमांद्वारे ठरवून देण्यात आलेल्या सेवा नागरिकांना देणे लोकसेवकाचे कर्तव्य आहे. कर्तव्य बजावण्यासाठी ते कोणत्याही लाभाची मागणी करू शकत नाही, असे असले तरी अनेक लोकसेवक चिरीमिरीसाठी नागरिकांची कामे अडवून ठेवतात. अशा प्रवृत्तीला कायमचे संपविण्यासाठी देशात हा कायदा लागू करण्यात आला आहे. भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी नागरिकांना पुढेही या कायद्याचा व्यापक उपयोग करीत राहावे लागणार आहे.

कठोर कारावासाच्या शिक्षेची तरतूद

भ्रष्टाचाराच्या विविध गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कालावधीच्या कठोर कारावासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यानुसार, लोकसेवकाने पदीय कार्याच्या बाबतीत लाच घेणे (कलम ७), कुणीही लोकसेवकाला प्रभावित करण्यासाठी लाच घेणे (कलम ८) आणि लोकसेवकासोबत असलेल्या वैयक्तिक संबंधाचा अवैध उपयोग करण्यासाठी लाच घेणे (कलम ९) या गुन्ह्यांसाठी आरोपीला ३ ते ७ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय, लोकसेवकाने कलम ८ व ९ मधील गुन्ह्यांना प्रोत्साहन देणे (कलम १०) व स्वत:कडील प्रकरणाशी संबंधित व्यक्तीकडून मौल्यवान वस्तू स्वीकारणे (कलम ११) याकरिता ६ महिने ते ५ वर्षे कारावास व दंड तर, फौजदारी स्वरूपाचे गैरवर्तन केल्यास ४ ते १० वर्षे कारावास व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

पाच वर्षांत ४१८८ तक्रारी

राज्यभरामध्ये गेल्या पाच वर्षांत लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध एकूण ४ हजार १८८ तर, या वर्षी आतापर्यंत २९ तक्रारी करण्यात आल्या.

वर्षनिहाय तक्रारी पुढील प्रमाणे 

वर्ष - तक्रारी

२०१७ - ९२५

२०१८ - ९३६

२०१९ - ८९१

२०२० - ६६३

२०२१ - ७७३

येथे करा भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध तक्रार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक - १०६४ आणि व्हॉट्सॲप क्रमांक ९९३०९९७७०० उपलब्ध आहे.

लाचेची मागणी सिद्ध करावी

भ्रष्ट लोकसेवकाला या कायद्यांतर्गत शिक्षा हाेण्यासाठी लाचेची मागणी सिद्ध करणे आवश्यक असते. त्यामुळे पीडित नागरिकांनी याविषयी पूर्ण काळजी घेतली पाहिजे. लोकसेवक अधिकृत कामे करण्यासाठी लाच मागत असल्यास त्याचे रेकॉर्डिंग करावे. त्याचा न्यायालयात उपयोग होऊ शकतो.

- ॲड. प्रकाश नायडू, प्रसिद्ध फौजदारी अधिवक्ता, नागपूर.

टॅग्स :Courtन्यायालयCorruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारी