शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकजूट व्हावे

By admin | Updated: November 17, 2014 00:57 IST

देशात पुन्हा एकदा धर्मसत्ता आणून सामाजिक गुलामगिरी थोपविण्याचे कटकारस्थान सुरू झाले आहे. एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढले आहेत तर दुसरीकडे नवभांडवलशाहीच्या माध्यमातून श्रमिक-मजुरांना

दलित हत्याकांड निषेध परिषद : श्यामदादा गायकवाड यांचे प्रतिपादन नागपूर : देशात पुन्हा एकदा धर्मसत्ता आणून सामाजिक गुलामगिरी थोपविण्याचे कटकारस्थान सुरू झाले आहे. एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढले आहेत तर दुसरीकडे नवभांडवलशाहीच्या माध्यमातून श्रमिक-मजुरांना संपविण्याचे घाट घातला जात आहे. तेव्हा या भीषण परिस्थितीतून दलित, शोषित, कष्टकरी, मजुरांना वाचविण्यासाठी आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकत्र येऊन लढणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)चे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांनी आज येथे केले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर) च्यावतीने आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी, सीपीएम, फॉरवर्ड ब्लॉक, जनता दल (यू), बोल्शेविक पक्ष, युडीएफ, शेकाप, समता सैनिक दल आदी विविध संघटनांच्या सहयोगाने रविवारी हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे ‘जवखेडे दलित हत्याकांड निषेध परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांच्या हस्ते मशाल पेटवून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. श्यामदादा गायकवाड म्हणाले, जवखेडे हत्याकांड हा केवळ योगायोग नाही तर ही जातीयवादी व्यवस्था पुन्हा देशात लागू करण्याची सुरुवात आहे. कारण या हत्याकांडातील दोषींना अजूनही अटक झालेली नाही. आरोपी कोण आहेत, हे सत्ताधाऱ्यांपासून तर विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. तरी आरोपीला अटक होत नाही, याला आणखी काय म्हणावे. आंबेडकरी संघटना आज कमकुवत झाल्या आहेत, आमचे नेते लाचार झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानंतर प्रतिकार करणारी संघटना आपण निर्माण करू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ही व्यवस्था केवळ दलितांच्या विरोधातच आहे असे नाही तर श्रमिक, कष्टकरी यांना संपविण्याचे घाट सुद्धा घातला जात आहे.या जातीयवादी आणि भांडवलशाहीविरुद्ध केवळ आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनीच लढा दिलेला आहे. आज या दोन्ही संघटनांची शक्ती कमकुवत झाली असली तरी ती संपलेली नाही. त्यामुळे नव्या दमाने पुन्हा लढण्यासाठी आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. रणजित मेश्राम आणि प्रदीप गायकवाड यांनीही जवखेडे हत्याकांडावर प्रकाश टाकला. भाऊराव बादसे यांनी क्रांतिगीत सादर केले. अशोक सरस्वती यांनी प्रास्ताविक मांडले. दिनेश अंडरसहारे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)