शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अजित पवारांचा ‘यू टर्न’ : ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 8:39 PM

काही दिवसाअगोदर ‘ईव्हीएम’चे प्रतिकात्मक दहन करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलली आहे. विरोधी पक्षातील नेते ‘ईव्हीएम’विरोधात असताना पवार यांनी याच्या समर्थनार्थ नागपुरात वक्तव्य केले. ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास आहे. या मशीनमध्ये सरसकट दोष आहे असे म्हणता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देलोकशाहीत पराभव स्वीकारता आला पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही दिवसाअगोदर ‘ईव्हीएम’चे प्रतिकात्मक दहन करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलली आहे. विरोधी पक्षातील नेते ‘ईव्हीएम’विरोधात असताना पवार यांनी याच्या समर्थनार्थ नागपुरात वक्तव्य केले. ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास आहे. या मशीनमध्ये सरसकट दोष आहे असे म्हणता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘ईव्हीएम’वर माझा पूर्ण विश्वास आहे. लोकशाहीत जर दारुण पराभव झाला तर तो मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे. ‘ईव्हीएम’मध्ये काही त्रुटी असती तर ती कुणीतरी सिद्ध करुन दाखविली असती. निवडणूक आयोगाने आवाहन केल्यानंतरदेखील कुणीही यासाठी समोर आले नाही. एखाद दुसऱ्या ठिकाणी तांत्रिक दोष असू शकतो. मात्र संपूर्ण ‘ईव्हीएम’ यंत्रणा सदोष आहे, असे म्हणता येणार नाही. जर ‘ईव्हीएम’मध्ये दोष असा तर भाजपचा सर्वच राज्यात विजय झाला असता. मात्र पंजाब, कर्नाटकमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अगदी बिहार, गुजरातमध्येदेखील ‘ईव्हीएम’ असतानादेखील त्यांच्या तोंडाला फेस आला होता. २०१४ मध्ये जनतेने भाजपला नव्हे तर नरेंद्र मोदी यांना मत केले होते, असे अजित पवार म्हणाले.शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावीराज्यात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज्य शासन ते मान्य करायला तयार नाही. अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात जलयुक्त शिवारचा बोलबाला झाला. मात्र अनेक ठिकाणी भूजल पातळी ही एक ते दीड मीटरने खालावली आहे. शेतकऱ्यांची स्थिती पाहता त्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई शासनाने दिली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.सरकारने ‘फिल्ड’वर यावेमुख्यमंत्री दररोज विविध जिल्ह्यांचा आढावा घेत आहे. मात्र दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिले पाहिजे. तसेच घोषणांचे प्रत्यक्ष शासन निर्णय लगेच निर्गमित झाले पाहिजेत, असे पवार म्हणाले. राज्यातील उद्योगपतींची बैठक घेऊन त्यांना ‘सीएसआर’चा निधी दुष्काळग्रस्त भागासाठी खर्च करण्यास सांगितले पाहिजे. शासनाने लोकप्रतिनिधींंना विश्वासात घेऊन पाण्याच्या वाटपाबाबत निर्णय घेतला पाहिजे, असे मतदेखील पवार यांनी व्यक्त केले.महाआघाडीबाबत आंबेडकरांशी चर्चा सुरूपुढील लोकसभा निवडणूकांसाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने ‘एमआयएम’सोबत हातमिळावणी केली आहे. मात्र याचा फायदा भाजपा-शिवसेनेला होईल. त्यामुळे त्यांना महाआघाडीसोबत आणण्यासाठी आम्ही चर्चा करत असून आमची आशा कायम आहे, असे अजित पवार यांनी प्रतिपादन केले. मनसेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सर्व मित्रपक्षांना जे मान्य असेल ते आम्ही ठरवू, असेदेखील ते म्हणाले.शिवस्मारकाची उंची कमी करू नयेशिवस्मारकावरुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन वर्षानंतरदेखील कामाला विलंब लागत असल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. जनतेच्या भावनांंशी जुळलेला हा विषय आहे. याला धक्का पोहोचविण्याची कृती भाजपा-शिवसेनेने करू नये असा इशाराच यावेळी अजित पवार यांनी दिला.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnagpurनागपूर