शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सावधान... अन्यथा दिल्लीप्रमाणे दूषित हाेईल नागपूरची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:00 AM

नागपूरमध्ये पीएम-२.५चा स्तर ४३.२ एमजीसीएम आहे. या हिशेबाने शहरातील हवेची गुणवत्ता धाेक्याच्या वरच आहे. त्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी आताच उपाययाेजना करणे आवश्यक आहे, अन्यथा स्थिती भयावह होऊ शकते.

ठळक मुद्देलाॅकडाऊन संपताच प्रदूषणात वाढ एअर क्वाॅलिटी इंडेक्स १५० पार

लोकमत एक्सक्लुसिव्ह

शाहनवाज आलम

नागपूर : शहरामध्ये हवेचे प्रदूषण वेगाने वाढत आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर प्रदूषणाच्या स्तरात सातत्याने वाढ हाेत आहे. रस्त्यावर धावणारी जुनी वाहने व साेबत उद्याेग कारखान्यांमधून निघणाऱ्या धुराने शहराची हवा प्रदूषित केली आहे. या कारणाने हवेच्या गुणवत्तेचा स्तर (एअर क्वाॅलिटी इंडेक्स-एक्यूआय) दरराेज दीडशे पार जात आहे.

रविवारी १५२ एक्यूआयची नाेंद झाली. दिवाळीनंतर प्रदूषणात आणखी भर झाली आहे. सध्या दिल्लीत प्रदूषणामुळे लाॅकडाऊन लागण्याची स्थिती आली आहे. नागपुरातही सतर्कता पाळली नाही तर दिल्लीप्रमाणे येथेही श्वास घेणे कठीण हाेईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते डब्ल्यूएचओनुसार वातावरणात पीएम-२.५चा स्तर २५ मायक्राेग्रॅम घनमीटर (एमजीसीएम) असे तर हवा स्वच्छ मानली जाईल. मात्र नागपूरमध्ये पीएम-२.५चा स्तर ४३.२ एमजीसीएम आहे. या हिशेबाने शहरातील हवेची गुणवत्ता धाेक्याच्या वरच आहे. त्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी आताच उपाययाेजना करणे आवश्यक आहे. अन्यथा स्थिती भयावह हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सातत्याने हाेत आहे वाढ

नागपुरात वायुप्रदूषणात सातत्याने वाढ नाेंदविली जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार शनिवारी हवेमध्ये पीएम-२.५चा स्तर ३६.०८ एमजीसीएम व पीएम-१० चा स्तर ९६.३ एमजीसीएम हाेता. दुसरीकडे एक्यूआय १२ नाेव्हेंबरला १३७, १३ नाेव्हेंबरला १५३ तर १४ नाेव्हेंबर राेजी १५२ एक्यूआयची नाेंद करण्यात आली.

महाराष्ट्रातील टाॅप-१० प्रदूषित शहरे (सर्व आकडे एमजीसीएममध्ये)

१. मुंबई : १०७

२. मुंबई उपनगर : ९१

३. रायगड : ५८

४. ठाणे : ५१

५. नागपूर : ४३

६. गोंदिया जिल्हा : ४३

७. भंडारा : ३९

८. नंदुरबार : ३७

९. वर्धा : ३७

१०. नांदेड : ३६

वाढू शकताे अनेक आजारांचा धाेका

पीएम-२.५ हवेत राहणारा अतिसूक्ष्म कण हाेय. त्याचा व्यास २.५ मायक्राेमीटरपेक्षा कमी असताे. हा स्तर अधिक वाढल्यास धुके वाढतात. समाेरचे दिसायलाही कठीण जाते. हे धूलिकण सूक्ष्म आकाराचे असल्याने श्वसनावाटे शरीरामध्ये जाऊन फुप्फुस, यकृतावर परिणाम करतात. यामुळे खाेकला, ताप आदी आजारांसह अस्थमा आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धाेकाही वाढताे. पीएम-२.५ लहान मुले व ज्येष्ठांसाठी अधिक धाेकादायक आहे. यामुळे डाेळे, गळा व फुफ्फुसाचा त्रास वाढताे. दुसरीकडे पीएम-१०चा स्तर सरासरी १०० एमजीसीएम असायला हवा. यापेक्षा अधिक वाढल्यास धाेकादायक मानला जाताे.

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषण