शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

तीन फेऱ्यांमध्ये मिळालेल्या पसंतीच्या कॉलेजमध्येच घ्यावा लागेल प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:03 IST

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल : तीनऐवजी होणार चार प्रवेश फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात सीईटीचे निकाल जाहीर झाल्यानंतरही अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही. दरम्यान तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये मिळालेले अनुक्रमे एक, तीन किंवा सहा पैकी कोणतेही पसंतीच्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य असेल.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बदलांबाबत अधिसूचना जारी केली आहे. वरील नियम राज्यभरातील विनाअनुदानित, खासगी व्यावसायिक संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहतील. यावेळी प्रक्रियेत तीन ऐवजी चार कॅप राउंड होतील.

चौथ्या फेरीनंतर कोणतीही सुधारणा होणार नाही. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तसेच, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची किंवा मागील फेरीत भरलेले ऑप्शन बदलण्याची संधी मिळेल. जर अर्जाच्या वेळी विद्यार्थ्याने पसंत केलेल्या महाविद्यालयाच्या पसंतीनुसार पहिल्या यादीतील पहिले महाविद्यालय, दुसऱ्या यादीतील पहिले तीन महाविद्यालय आणि तिसऱ्या यादीतील पहिल्या ६ महाविद्यालयात सीट मिळाली, तर प्रवेश निश्चित मानला जाईल.

हे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र राहणार नाहीत. म्हणजेच या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य असेल. याशिवाय, चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेऱ्या घेतल्या जातील. त्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. जर या फेरीत संस्थेने अर्ज नाकारला तर विद्यार्थी सीईटी सेलच्या वेबसाइटवर अर्ज करू शकतील.

कॉलेज कोट्याच्या प्रवेशासाठी भरावे लागेल तीनपट शुल्ककॉलेज कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संस्था निर्धारित शुल्काच्या तीन पट अधिक शुल्क आकारू शकते. तर, अनिवासी भारतीय कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पाच पट अधिक शुल्क आकारले जाऊ शकते. चारही फेऱ्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थात्मक कोट्याची घोषणा केली जाईल. विद्यार्थी चारही फेऱ्यांमध्ये संस्थात्मक कोट्याच्या जागांसाठी अर्ज करू शकतात. संस्थांना या फेरीची प्रक्रिया देखील गुणवत्तेच्या आधारे पूर्ण करावी लागेल. संस्थांना वेबसाइटवर गुणवत्ता यादी प्रकाशित करणे बंधनकारक असेल.

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाnagpurनागपूर