शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

तीन फेऱ्यांमध्ये मिळालेल्या पसंतीच्या कॉलेजमध्येच घ्यावा लागेल प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:03 IST

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल : तीनऐवजी होणार चार प्रवेश फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात सीईटीचे निकाल जाहीर झाल्यानंतरही अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही. दरम्यान तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये मिळालेले अनुक्रमे एक, तीन किंवा सहा पैकी कोणतेही पसंतीच्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य असेल.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बदलांबाबत अधिसूचना जारी केली आहे. वरील नियम राज्यभरातील विनाअनुदानित, खासगी व्यावसायिक संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहतील. यावेळी प्रक्रियेत तीन ऐवजी चार कॅप राउंड होतील.

चौथ्या फेरीनंतर कोणतीही सुधारणा होणार नाही. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तसेच, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची किंवा मागील फेरीत भरलेले ऑप्शन बदलण्याची संधी मिळेल. जर अर्जाच्या वेळी विद्यार्थ्याने पसंत केलेल्या महाविद्यालयाच्या पसंतीनुसार पहिल्या यादीतील पहिले महाविद्यालय, दुसऱ्या यादीतील पहिले तीन महाविद्यालय आणि तिसऱ्या यादीतील पहिल्या ६ महाविद्यालयात सीट मिळाली, तर प्रवेश निश्चित मानला जाईल.

हे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र राहणार नाहीत. म्हणजेच या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य असेल. याशिवाय, चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेऱ्या घेतल्या जातील. त्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. जर या फेरीत संस्थेने अर्ज नाकारला तर विद्यार्थी सीईटी सेलच्या वेबसाइटवर अर्ज करू शकतील.

कॉलेज कोट्याच्या प्रवेशासाठी भरावे लागेल तीनपट शुल्ककॉलेज कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संस्था निर्धारित शुल्काच्या तीन पट अधिक शुल्क आकारू शकते. तर, अनिवासी भारतीय कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पाच पट अधिक शुल्क आकारले जाऊ शकते. चारही फेऱ्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थात्मक कोट्याची घोषणा केली जाईल. विद्यार्थी चारही फेऱ्यांमध्ये संस्थात्मक कोट्याच्या जागांसाठी अर्ज करू शकतात. संस्थांना या फेरीची प्रक्रिया देखील गुणवत्तेच्या आधारे पूर्ण करावी लागेल. संस्थांना वेबसाइटवर गुणवत्ता यादी प्रकाशित करणे बंधनकारक असेल.

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाnagpurनागपूर