शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा : वनविभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 9:36 PM

कोरोनाच्या प्रकोपाने इतर गोष्टींचा उल्लेख गौण ठरला असला तरी नैसर्गिक घटकांच्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मे महिना सुरू झाला आणि उन्हाचा प्रकोप आता तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अशावेळी वन्यजीवांसाठी जंगलात पाण्याची उपलब्धता कमी झालेली असते. मात्र जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

ठळक मुद्देवर्षभर पावसाची हजेरी फळाला, टँकरनेही पुरवठा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रकोपाने इतर गोष्टींचा उल्लेख गौण ठरला असला तरी नैसर्गिक घटकांच्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मे महिना सुरू झाला आणि उन्हाचा प्रकोप आता तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अशावेळी वन्यजीवांसाठी जंगलात पाण्याची उपलब्धता कमी झालेली असते. मात्र जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. यावर्षी पावसाने वर्षभर मेहेरबानी केली असल्याने नैसर्गिक आणि कृ त्रिम पाणवठे फुल्ल असून प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.उन्हाळा आला की पाणीप्रश्न पेटतो. मानवाला जसा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तसा तो वन्यजीवांच्या वाट्यालाही असतोच. आकाशात सूर्य आग ओकत असताना जंगलात पाणवठे कोरडे पडले असतात. अशावेळी प्राण्यांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागते. दरवर्षी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात आणि मानव- वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. अनेक प्राणी पाण्याच्या शोधात विहिरी किंवा तलावात पडल्याच्या घटना समोर येतात. वनविभागाला टँकरद्वारे दरवर्षी जंगलातील पाणवठ्यात पाणी टाकावे लागते. काही स्वयंसेवी संस्थाही या कामात विभागाची मदत करतात. यावर्षी मात्र अशी भीषण पाणीटंचाई दिसून येत नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. वर्षभर झालेली वरुणराजाची हजेरी लाभदायक ठरली आहे.पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी सांगितले, वनविभागाला दरवर्षी जंगलात पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करावे लागते. त्यानुसार कृ त्रिम पणावठ्यांची निर्मिती केली आहे. पेंच प्रकल्पात ११४ नैसर्गिक, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणारे १४५ कृ त्रिम आणि सौरऊर्जेवर चालणारे ६४ पाणवठे आहेत. बोर अभयारण्यात ३२ नैसर्गिक, ८२ कृ त्रिम व ४६ सौर पंप आहेत. दुसरीकडे टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यात २८ नैसर्गिक, १४ कृ त्रिम आणि ५० सौर पंप आहेत. या पाणवठ्यांवर पुरेसा पाणीसाठा असून सध्यातरी कमतरता नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातही पाणवठ्यावर मुबलक पाणीसाठा असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची सध्या गरज पडली नाही. गरज पडल्यास तसे करण्यात येईल, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जात असल्याचा विश्वास स्थानिक अधिकाऱ्यांनी दिला.वणवे आणि नियंत्रणाकडे लक्षउन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जंगलसफारीकडे लोकांचा कल वाढतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे वन्य पर्यटन बंद असल्याने पर्यटकांची व्यवस्था करण्याचा कर्मचाऱ्यांचा ताण कमी झाला आहे. मात्र उन्हाळ्यात जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे वणवे नियंत्रित करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांकडे कायम आहे. याशिवाय तस्करी रोखण्यासाठी गस्तही वाढविण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :forestजंगलWaterपाणी